शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कष्टकरीदादाचा जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: December 3, 2014 22:48 IST

शेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो.

प्रकाश काळे - हरदोनाशेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो. शेतात जिवापाड कष्ट करणारा शेतकरीदादा आज जीवन मरणाचा संघर्ष करीत आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे बघितले तर याची प्रचिती प्रकर्षाने येते. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राण्यांनी मोठा हैदोस घातला आहे. शेतपिकांना जपण्यासाठी शेतकरीदादाला थंडीत कुडकुडत मचाणीवर उभा राहून राखण करावी लागते. वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोटासाठी, पुढील भविष्यासाठी त्याला हे करावे लागते. महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा,कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. यावर्षी तब्बल एक महिना उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. मात्र हे सारे दु:ख काळजात लपवून बळीराजा शेतीसाठी सज्ज झाला. उत्पादनात वाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. सरकारने चार हजार पन्नास रुपये कापूस दर जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरीदादाची सरकारला जराही दया आली नाही. राजुरा तालुका पांढऱ्या व काळ्या सोन्यासाठी अग्रेसर मानला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोळसा खाणी देशाच्या नकाशावर असल्यातरी वेकोलिने कोळसा उत्खननानंतर निघालेली माती परिसरात टाकल्याने या मातीवर डोंगराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. शेतात कापसासोबतच गहु, धान, हरभरा, तूर आदी पीके घेतली जातात. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरांसह वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात कळप असल्याने एका रात्रीतून डौलदार पिकांची वाट लावली जात आहे. जंगली जनावरांपासून पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या फटाक्याची आतिषबाजी शेतात केली. फटाकच्याच्या आवाजाने जंगली जनावरे पुन्हा शेताकडे फिरकणार नाही, हा शेतकऱ्यांचा समज फसवा निघाला. शेतपिकांशिवाय शेतात खायला काहीच नसल्यामुळे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्धवस्त करीत आहे. त्यासाठी बळीराजाने जिवाची तमा न बाळगता शेतात ‘मचान’ उभारुन शेतपिकांच्या रक्षणासाठी जागल करणे सुरू केले आहे.