शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरीदादाचा जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: December 3, 2014 22:48 IST

शेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो.

प्रकाश काळे - हरदोनाशेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो. शेतात जिवापाड कष्ट करणारा शेतकरीदादा आज जीवन मरणाचा संघर्ष करीत आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे बघितले तर याची प्रचिती प्रकर्षाने येते. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राण्यांनी मोठा हैदोस घातला आहे. शेतपिकांना जपण्यासाठी शेतकरीदादाला थंडीत कुडकुडत मचाणीवर उभा राहून राखण करावी लागते. वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोटासाठी, पुढील भविष्यासाठी त्याला हे करावे लागते. महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा,कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. यावर्षी तब्बल एक महिना उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. मात्र हे सारे दु:ख काळजात लपवून बळीराजा शेतीसाठी सज्ज झाला. उत्पादनात वाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. सरकारने चार हजार पन्नास रुपये कापूस दर जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरीदादाची सरकारला जराही दया आली नाही. राजुरा तालुका पांढऱ्या व काळ्या सोन्यासाठी अग्रेसर मानला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोळसा खाणी देशाच्या नकाशावर असल्यातरी वेकोलिने कोळसा उत्खननानंतर निघालेली माती परिसरात टाकल्याने या मातीवर डोंगराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. शेतात कापसासोबतच गहु, धान, हरभरा, तूर आदी पीके घेतली जातात. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरांसह वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात कळप असल्याने एका रात्रीतून डौलदार पिकांची वाट लावली जात आहे. जंगली जनावरांपासून पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या फटाक्याची आतिषबाजी शेतात केली. फटाकच्याच्या आवाजाने जंगली जनावरे पुन्हा शेताकडे फिरकणार नाही, हा शेतकऱ्यांचा समज फसवा निघाला. शेतपिकांशिवाय शेतात खायला काहीच नसल्यामुळे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्धवस्त करीत आहे. त्यासाठी बळीराजाने जिवाची तमा न बाळगता शेतात ‘मचान’ उभारुन शेतपिकांच्या रक्षणासाठी जागल करणे सुरू केले आहे.