शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गतिमान व पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य

By admin | Updated: May 20, 2016 00:59 IST

प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे हाकून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही शासनाची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते.

आशुतोष सलील : नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मनोदयचंद्रपूर : प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे हाकून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही शासनाची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते. ते कर्तव्य चोखपणे बजावताना गतीमान अणि पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य देण्यावर आपला भर असेल. या सोबतच, लोकाभिमुख प्रशासनातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली यंत्रणा कार्यरत असेल, असा मनोदय चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला.वर्धा येथून जिल्हाधिकारी पदावर नव्याने बदलून आल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भेट घेवून चर्चा केली असता ते बोलत होते. यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असतानाचा येथील अनुभव पाठिशी घेवून आता जिल्हाधिकारी म्हणून परतलेले आशुतोष सलील उत्साही दिसले. ते म्हणाले, बदलीचा आदेश घेवून चंद्रपूरच्या प्रवासाठी निघालो तेव्हाच पुढची तीन वर्षे फक्त चंद्रपूर डोक्यात ठेवायचे, हे मनाशी ठरवूनच येथे पोहचलो. जनतेच्या आपणाकडून अपेक्षा बऱ्याच असल्याने जरा दडपण आल्यासारखे वाटत आहे. मात्र सर्वांच्या सोबतीने प्रशासकीय कार्यातून नवी पाऊलवाट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा त्यांचा निर्धार दिसला. अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल रेंगाळण्याच्या प्रकाराबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, यामुळे वेळेचा अपव्यय आणि जनतेला नाहक त्रास होतो. ही अवस्था पालटण्यासाठी आणि गतीमान पारदर्शी प्रशासन आणण्यासाठी ‘फाईल ट्रॅकींग’ पद्धत अंमलात आणण्याचा विचार आहे. कार्यालयात एकूण किती फाईली आहेत, कुण्या अधिकाऱ्यांकडे किती फाईली केव्हापासून पेंडिंग आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे, हे संगणकीय प्रणालीच्या माध्यामातून चटकन कळावे, अशी व्यवस्था असेल. आपली फाईल नेमकी कोणत्या टेबलवर कोणत्या कारणासाठी अडून आहे, हे संबंधितांना कळण्याचीही व्यवस्था यातून अंमलात आपली जाणार आहे. जनतेच्या मदतीसाठी उभे राहणार ‘सेवादूत’अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे बरेचदा सर्वसामान्यांची कामे अडतात. अनेकदा सर्वसामान्य जनतेला शासकीय कार्यपद्धतीबद्दल माहिती नसते. त्यामुळे वाद होतात. प्रकरणे रेंगाळतात, त्यावर उपाय म्हणून तहसील कार्यालय स्तरावर सेवादुतांची नियुक्ती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हे सेवादूत निर्धारित दिवशी दिवसभर कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करतील. या सोबतच, तालुका कार्यालयात चलचित्रफितींच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केले जाईल. वर्धा जिल्ह्यात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या समस्यांचे सर्व्हेक्षण याच योजनेच्या अंमलबजावणीच्या उद्देशान केले होते. चंद्रपूर जिल्ह्यात ‘सेवादूत’ योजना राबविताना त्या माहितीचा योग्य उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.