शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या दहशतीमुळे शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावावरून ताडोबा हे नाव देण्यात आले तर अंधारी वन्यजीव अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या नदीवरून अंधारी हे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिवारात वावर वाढला : पूर्वीसारखे बिनधास्त शेतात जाणे दुरापस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्हा देशपातळीवर लक्षवेधक ठरला आहे. वाघाचे हमखास दर्शन म्हणून ताडोबाला संबोधले जाते. मात्र आता हे व्याघ्रदर्शन संपूर्ण जिल्ह्यातच होत आहे. एक दोन तालुके वगळले तर जवळजवळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जंगलात वाघाचा वावर दिसून आला आहे. मात्र हे वाघ, बिबटे आता शेतशिवारात आणि गावालगत येऊ लागल्याने शेती व्यवसाय संकटात आला आहे.पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावावरून ताडोबा हे नाव देण्यात आले तर अंधारी वन्यजीव अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या नदीवरून अंधारी हे नाव देण्यात आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५,४० चौरस किमीमध्ये असून सभोवताली ११०१ चौरस किमी क्षेत्र हे बफर म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्रप्रकल्प आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील फक्त २० टक्के भाग पर्यटकांना खुला आहे. त्यामध्ये पर्यटकांना आजवर येडा अन्ना, वाघडोह, माधुरी, सोनम, काटेझरी मेल, गब्बर, मटकासूर, मोवा खड्डा, कॅटरिना, तारा, माया अशा विविध नावांच्या वाघांनी मोहित केले आहे. हमखास वाघोबाचे दर्शन होते म्हणून पर्यटकही ताडोबाला भेटी देऊ लागले. हळूहळू विदेशी पर्यटकांनाही येथील वाघांची भूरळ पडत गेली. या वाघांनी वनविभागाला चांगलाच महसूल मिळवून दिला. मात्र आता हे वाघच ताडोबाबाहेरील लोकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहे.शेतशिवारात अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणे हे वाघ, बिबटे दिसू लागले आहेत. पहाटे किंवा रात्री शेतात जाण्यास शेतकरी तयार नाहीत. कधी वाघाचे दर्शन होईल आणि हल्ला याचा काहीही नेम उरलेला नाही.शासनाने वन्यजीव सरंक्षण कायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे सरंक्षण मिळाले आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शिवारात शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे नुकसान तर करतातच पण शेतकºयांवरही हल्ले करून शेतकऱ्यांचा जीव घेतात. जंगलालगत असलेल्या शेतशिवारात रात्र आणि दिवस वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करावे लागत आहे.वाघ पोहचला चंद्रपूरपर्यंतचंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र आहे. चंद्रपूरच्या सभोवताल कोळशाच्या खाणी, वीज केंद्र, एमईएल व इतर काही उद्योग आहेत. असे असतानाही चंद्रपूरपर्यंत आता वाघ पोहचला आहे. बुधवारी पहाटे नागरिकांना इरई नदीच्या पात्राजवळ वाघाचे दर्शन झाले. उर्जानगर परिसरातही वाघाचा वावर आहे. एवढेच नाही तर चंद्रपूर वीज केंद्र परिसरात बिबटेही दिसून आले आहेत. काही महिन्यापूर्वी तर एक अस्वल चक्क चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात आले होते.शेतात जाण्याची मजाच गेलीशेतात जाण्याच्या आकर्षणामुळे शहरी भागात राहणारे नागरिक विशेषत: तरुण गावखेड्यातील आपल्या नातेवाईकांकडे जायचे. रबी हंगाम सुरू असताना तर खास शेतात जाण्याची, तेथील तुरीच्या शेंगा, हरभरा खाण्याची मजा औरच असते. त्यामुळे शहरातील नागरिक या कालावधीत गावातील आपल्या नातेवाईकांकडे हमखास जायचे. तिथे जाऊन शेतात धम्माल मजा करायचे. मात्र आता वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे शहरातील नागरिक तर सोडाच गावातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.अनेक शेतकऱ्यांचा बळीपूर्वी जंगलात सरपणासाठी गेलेल्यांवर वाघ किंवा बिबट हल्ले करीत असत. यावेळी चुका नागरिकांच्या आणि त्यांच्या गरजांच्या होत्या. मात्र आता तर चक्क शेतातच वाघांचे हल्ले होत आहे. अनेकदा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. काही महिन्यांपूर्वी राजुरा, सिंदेवाही, भद्रावती तालुक्यातील काही भागात वाघ, बिबट्याचा एवढा धुमाकूळ वाढला होता की शेतकऱ्यांनी शेतात जाणेच बंद केले होते.वाघाचे प्रजननही ताडोबाच्या बाहेरताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघ उन्हाळ्याच्या दिवसात शिकार आणि पाण्याच्या शोधात प्रकल्पाबाहेर येतात. त्यानंतर अनेक वाघांचे प्रजनन हे ताडोबाच्या बाहेरच होते. त्यामुळे त्यांचे बछडे हे प्रकल्पाबाहेर असतात. त्यांचा अधिवास ताडोबाबाहेरील जंगलात असतो. या प्रकारामुळेही ताडोबाबाहेर वाघांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Tigerवाघ