शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

धानाचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, नागभीड, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाने चांगल्या प्रमाणात ...

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, नागभीड, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने धानाचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ऐन धान कापणीच्या वेळी धानाला विविध रोगांची लागण झाली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने दोन ते तीनदा फवारणी केली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मळणीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन घटत आहे. ज्या एक एकरामध्ये २० च्या जवळपास धानाच्या पोते व्हायचे, तेथे केवळ सात ते आठ पोते धान होत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. पूर्वी शेतकरी विविध संकटांत सापडला असल्याने त्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. आता पुन्हा उत्पादन घटल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

बॉक्स

चुकारा मिळण्यास विलंब

ज्या शेतकऱ्यांची धानमळणी झाली आहे, त्यांनी शासनाच्या केंद्रावर विक्री करण्यासाठी धान टाकले आहे. मात्र तेथे धानाचा लिलाव होऊन चुकारा मिळण्यास बराच विलंब लागतो. याउलट खासगी व्यापारी त्वरित पैसे देत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्याकडे धानाची विक्री करीत आहेत. मात्र त्यांना प्रतिक्विंटलमागे पाचशे ते सहाशे रुपयांचे नुकसान होत आहे.