शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

धानाचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, नागभीड, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाने चांगल्या प्रमाणात ...

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, नागभीड, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने धानाचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ऐन धान कापणीच्या वेळी धानाला विविध रोगांची लागण झाली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने दोन ते तीनदा फवारणी केली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मळणीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन घटत आहे. ज्या एक एकरामध्ये २० च्या जवळपास धानाच्या पोते व्हायचे, तेथे केवळ सात ते आठ पोते धान होत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. पूर्वी शेतकरी विविध संकटांत सापडला असल्याने त्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. आता पुन्हा उत्पादन घटल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

बॉक्स

चुकारा मिळण्यास विलंब

ज्या शेतकऱ्यांची धानमळणी झाली आहे, त्यांनी शासनाच्या केंद्रावर विक्री करण्यासाठी धान टाकले आहे. मात्र तेथे धानाचा लिलाव होऊन चुकारा मिळण्यास बराच विलंब लागतो. याउलट खासगी व्यापारी त्वरित पैसे देत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्याकडे धानाची विक्री करीत आहेत. मात्र त्यांना प्रतिक्विंटलमागे पाचशे ते सहाशे रुपयांचे नुकसान होत आहे.