शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:41 PM

पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१०२ शेतकऱ्यांना कृषिपंप : ७१ शेतकºयांना सौरपंपाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.केंद्र शासनाने राज्याकरिता केवळ सात हजार ५४० सौर ऊर्जापंपाचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राध्यान देण्यात आले. पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राअभावी विज पंप बसवू न शकणारे शेतकरी, महावितरणकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकीही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजजिकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही, अशा शेतकºयांच्या शेतात सौर कृषीपंप लावल्या जाते. शेत जमिनीचे क्षेत्र पाच एकर पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही. महावितरणच्या सहाय्याने जिल्ह्यामध्ये १३५ पंपाकरिता २०२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील १७३ अर्जाना मंजुरी देऊन डिमांड भरलेल्या १०२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाचा लाभ देण्यात आला. हे शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी स्वावलंबी झाले आहेत. सौर कृषिपंपामुळे उत्पन्नाची हमी मिळाली असून अतिदुर्गम भागातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पीक घेऊ लागले आहेत.योजनेची व्याप्ती वाढवावीदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. मात्र या योजनेबाबत अद्यापही अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. संबंधित विभागाकडून याबाबत पाहिजे तसा प्रचार-प्रसार करीत जनजागृती करण्यात आलेली नाही. आता कृषी विभागाने याबाबत विशेष पाऊल उचलून योजनेची व्याप्ती वाढवावी.