शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:41 IST

पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१०२ शेतकऱ्यांना कृषिपंप : ७१ शेतकºयांना सौरपंपाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.केंद्र शासनाने राज्याकरिता केवळ सात हजार ५४० सौर ऊर्जापंपाचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राध्यान देण्यात आले. पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राअभावी विज पंप बसवू न शकणारे शेतकरी, महावितरणकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकीही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजजिकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही, अशा शेतकºयांच्या शेतात सौर कृषीपंप लावल्या जाते. शेत जमिनीचे क्षेत्र पाच एकर पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही. महावितरणच्या सहाय्याने जिल्ह्यामध्ये १३५ पंपाकरिता २०२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील १७३ अर्जाना मंजुरी देऊन डिमांड भरलेल्या १०२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाचा लाभ देण्यात आला. हे शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी स्वावलंबी झाले आहेत. सौर कृषिपंपामुळे उत्पन्नाची हमी मिळाली असून अतिदुर्गम भागातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पीक घेऊ लागले आहेत.योजनेची व्याप्ती वाढवावीदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. मात्र या योजनेबाबत अद्यापही अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. संबंधित विभागाकडून याबाबत पाहिजे तसा प्रचार-प्रसार करीत जनजागृती करण्यात आलेली नाही. आता कृषी विभागाने याबाबत विशेष पाऊल उचलून योजनेची व्याप्ती वाढवावी.