शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

शेतकऱ्यांचे जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:08 IST

शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले,....

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

ऑनलाईन लोकमतभद्रावती: शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले, असे मत सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले़ बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ आमदार बाळू धानोरकर आणि शिक्षक सेनेच्या वतीने आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते़याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू न. प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार शितोळे, ठाणेदार बी मडावी, निबंध स्पर्धा प्रकल्प अधिकारी नंदकिशोर धानोरकर, राजू चिकटे, वासुदेव ठाकरे, भास्कर ताजने, कविश्वर शेंडे, किशोर हेपट, नफिस हलपी, व्ही. राठोड उपस्थित होते.अनासपुरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा ही काळाची गरज आहे. एक शेतकरी म्हणून आमचेही जगन मान्य करा, असेही त्यांनी नमूद केले़ निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यानिमित्त उलट-सुलट हा नाट्यप्रयोगही सादर करण्यात आला़ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अनासपुरे यांनी भूमिका मांडली़ शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत १ हजार १३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एक धगधगता अंगार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे व शिवसेना महाराष्टÑाची गरज आदी विषयांवर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती़स्पर्धेतील प्रथम पुरस्कार टेमुर्डा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयातील सूरज भुते या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला़ विवेकानंद महाविद्यालयातील उज्वला उज्वला नागपूरे द्वितीय, तर तृतीय पुरस्कार तृप्ती आगलावे हिने पटकाविला़ २० स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले़ ित्यामध्ये दीक्षा कांबळे, वैशाली पडवे, निकिता धोबे, प्रभाकर चिंचोळकर, निलम सागुळले, नम्रता जोगी, अश्विनी धोटे, सत्यवान निखाडे, प्राजक्ता देठे, प्राजक्ता जुमनाके, स्नेहा बलकी, शबिना शेख, प्रफुल चामाटे, मेबा वाकडे, वैष्णवी सातपुते, वैशाली ढगे, सलोनी फुलमाळी, निकिता कडाम, वैशाली डहाके, श्वेता देशकर आदींचा समावेश आहे.आमदार धानोरकर म्हणाले, ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असते़ मात्र, संधी मिळणे गरजेचे आहे़ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घटनांविषयी आजची पिढी जागरूक असल्याचे या स्पर्धेतून दिसून आले़शेतकºयांच्या समस्या आजही कायम असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली़ नाट्यप्रयोगाला तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला़हा नाट्यप्रयोग नि:शुल्क ठेवण्यात आला होता़ संचालन प्रा. सचिन सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना, शिक्षक सेनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते़

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे