शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचा बाजार समितीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

घनश्याम नवघडे नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धानाचे भाव वाढत आहेत. या आठवडयात गुरूवारी व शुक्रवारी २ हजार ...

घनश्याम नवघडे

नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धानाचे भाव वाढत आहेत. या आठवडयात गुरूवारी व शुक्रवारी २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोचला. शिवाय, खरेदीची प्रक्रीया सोपी असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल वाढू लागला आहे.

असेच चित्र राहिल्यास आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी व पणन महासंघाच्या धान खरेदीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्ह आहेत.

मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आला. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायट्यांकडे धान विक्रीसाठी शेतक-यांचा कल वाढला होता. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी तालुक्यात आठ आदिवासी सोसाट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. यावर्षीही हंगामाच्या प्रारंभीच ३ हजार ९४० शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ९ सोसायट्यांकडे नोंदणीही केली होती. शिवाय, आदिवासी विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या ९ सोसायट्या व पणन महासंघाकडून धान खरेदीचा प्रारंभही करण्यात आला होता. मात्र, कृउबासमध्ये गुरूवारपासून अचानक चांगल्या धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत गेला. परिणामस्वरूप, शेतकऱ्यांचा कल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरामध्ये थोडी तफावत असली तरी सोसायट्या व पणन महासंघाकडे धान विक्रीला ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात. कृउबासमध्ये असा प्रकार घडत नसल्याने शेतक-यांचा प्रतिसाद वाढत आहे.

बॉक्स

नागभीड तालुका धानाचे कोठार

तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. त्यामुळे तालुक्याला धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी काढत असतात. धानाची खरेदी व विक्री मार्च महिन्यापर्यंत जोरात असते. त्यानंतर जूनव जुलैपर्यंत या व्यवहारात थोडी तेजी येत असते असा आजवरचा अनुभव आहे.

कोट

गुरूवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. बाजार समितीत कोणत्याही प्रक्रियाही पार पाडाव्या लागत नाही. कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान सुरक्षित असतात.भाव वाढण्याची आणखी शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीत यावर्षी विक्रमी खरेदी होणार आहे.

- आवेश पठाण, सभापती कृउबास, नागभीड.