शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचा बाजार समितीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

घनश्याम नवघडे नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धानाचे भाव वाढत आहेत. या आठवडयात गुरूवारी व शुक्रवारी २ हजार ...

घनश्याम नवघडे

नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धानाचे भाव वाढत आहेत. या आठवडयात गुरूवारी व शुक्रवारी २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोचला. शिवाय, खरेदीची प्रक्रीया सोपी असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल वाढू लागला आहे.

असेच चित्र राहिल्यास आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी व पणन महासंघाच्या धान खरेदीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्ह आहेत.

मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आला. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायट्यांकडे धान विक्रीसाठी शेतक-यांचा कल वाढला होता. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी तालुक्यात आठ आदिवासी सोसाट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. यावर्षीही हंगामाच्या प्रारंभीच ३ हजार ९४० शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ९ सोसायट्यांकडे नोंदणीही केली होती. शिवाय, आदिवासी विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या ९ सोसायट्या व पणन महासंघाकडून धान खरेदीचा प्रारंभही करण्यात आला होता. मात्र, कृउबासमध्ये गुरूवारपासून अचानक चांगल्या धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत गेला. परिणामस्वरूप, शेतकऱ्यांचा कल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरामध्ये थोडी तफावत असली तरी सोसायट्या व पणन महासंघाकडे धान विक्रीला ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात. कृउबासमध्ये असा प्रकार घडत नसल्याने शेतक-यांचा प्रतिसाद वाढत आहे.

बॉक्स

नागभीड तालुका धानाचे कोठार

तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. त्यामुळे तालुक्याला धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी काढत असतात. धानाची खरेदी व विक्री मार्च महिन्यापर्यंत जोरात असते. त्यानंतर जूनव जुलैपर्यंत या व्यवहारात थोडी तेजी येत असते असा आजवरचा अनुभव आहे.

कोट

गुरूवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. बाजार समितीत कोणत्याही प्रक्रियाही पार पाडाव्या लागत नाही. कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान सुरक्षित असतात.भाव वाढण्याची आणखी शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीत यावर्षी विक्रमी खरेदी होणार आहे.

- आवेश पठाण, सभापती कृउबास, नागभीड.