शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देमिळेल त्या मार्गाने पिकांना दिले जात आहे पाणी

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : धानाचे पीक अंतिम टप्प्यात येत असतानाच पावसाने डोळे वटारल्याने धानाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धडपड सुरू झाली आहे. मिळेल त्या मार्गाने व मिळेल त्या साधनाने पाणी कसे मिळेल व धान कसे वाचेल, याच विवंचनेत या शेतकरी आहेत.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक निभायच्या मार्गावर आहे. मात्र आता या तालुक्यातील भारी धान पीक अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात धान गर्भावस्थेत येण्याचा काळ सुरू होईल. आणि नेमक्या याच वेळेस धानास पाण्याची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने घुमजाव केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी नाले, विहिरी या स्त्रोतातून आॅईल इंजिन, मोटरपंप याद्वारे पाणी घेऊन पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत.उत्पादनावर परिणाम होणारज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे किंवा शेताजवळ नाला आहे, असे शेतकरी साधनांचा वापर करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात असले तरी ज्या शेतकऱ्यांना अशी कोणतीही सोय नाही, अशा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार बसून त्याचा परिणाम उत्पादनावर निश्चित होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प