शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे आधारभूत केंद्र शासनाने निर्माण केले आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकीय धान ...

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे आधारभूत केंद्र शासनाने निर्माण केले आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस रूपाने देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केला आहे. परंतु जाहीर केलेल्या निर्णयानुसार आजपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून चालू हंगामात बी-बियाणे, खते आणि मजुरांची मजुरी द्यायची कशी, असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्याचा हात देण्यासाठी शासनाने बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, अखिल गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार यांनी केली आहे.