शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: August 27, 2016 00:30 IST

गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी ...

गडचिरोली-नागपूर मार्ग रोखला : दोन तास वाहतूक ठप्पब्रह्मपुरी : गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी नागपूर-गडचिरोली राज्य मार्गावर किन्ही गावाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजता रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने अखेर प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली. गोसीखुर्दच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असे वृत्त गुरुवारी लोकमतने प्रकाशित केले होते. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून रोष व्यक्त केला. गोसीखुर्द कालवा बी-३ कालवा किन्ही या गावाजवळ गट क्र. १३९ मध्ये ६० मीटरचे काम मागील वर्षापासून बंद आहे. खरकाडा, निलज, रुई, पाचगाव, रणमोचन, पिंपळगाव इतर गावातील ५ हजार ७३९ हेक्टर आर पैकी ३४४ हेक्टर शेतजमिनीला हे पाणी मिळणार होते. परंतु ६० मीटर जमिनीच्या मालकाने अडवणूक केल्याने पाण्यापासून शेतकरी वंचित होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी गोसीखुर्द विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी ही गंभीर बाब लक्षात आणून दिली. पण काही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी दुपारी मनसे जिल्हाउपाध्यक्ष आनंद बावणे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नानाजी तुपट यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी राज्य मार्गावर आडवा ट्रक लावून दोन तास वाहतूक रोखून धरली. शेवटी तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार राठोड, गोसिखुर्द कालव्याचे सहा. अभियंता जितेंद्र मडावी, पोलीस निरीक्षक ओ.बी. अंबाडकर यांच्या मध्यस्थितीने तोडगा काढून दोन तासानंतर वाहतूक सुरू झाली. यावेळी रणमोचनचे सरपंच मंगेश दोनाडकर, खरकाडाचे सरपंच वंदना खरकाटे, उपसरपंच तारकेश्वर तोंडरे, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे व पाच गावातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)पाण्यासाठी प्रसंगीमरण्याची तयारीजमावकर्त्यांनी रस्ता रोखून गडचिरोली व नागपूरला जाणारी असंख्य वाहने अडवून ठेवली. त्यामागे त्यांच्या शेतीतील धान पिके करपायला लागली असल्याने हा रोष व्यक्त करण्यात आला. जर या दोन-तीन दिवसात धानाला पाणी मिळाले नाही तर प्रसंगी आम्ही मरणासही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रखडलेले बांधकाम सोमवारपासून सुरू करण्याची लेखी हमी दिली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून काम पूर्ण करण्यात येईल.- जितेंद्र मडावीसहा. अभियंता, गोसीखुर्द विभाग.