शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतमालाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:52 IST

शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली.

ठळक मुद्देकापसाचे भाव पडले : सोयाबीन, हरभरा तुरीला मंदी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसवेना

प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली. शेतमालाचे वाढलेले भाव पूर्णत: घसरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू लागले आहे. त्यामुळे शेतकरीराजा मनाने मोडून पडला आहे.शेतकºयांचे दु:ख आज सर्वांनाच माहीत आहे. जगाचा पोशिंदाच कोलमडून पडला आहे. शेतकºयांची सारी शोभा शेतमालाच्या दरवाढीवर अवलंबून असते. त्यासाठी शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून उत्पादन वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु सर्व परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाली आहे. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो. यावर्षी कापसाचे भाव पाच हजार रुपयांच्या वर गेले होते. परंतू बोंडअळीचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव चार हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांना कापूस विकायला परवडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी तर दुसरीकडे दर पूर्णत: कोलमडल्याने शेतकरी पार हताश झाला आहे.आजघडीला कापसाचा सर्वाधिक पेरा असताना त्याच पांढऱ्या सोन्याचे दर एक हजार रुपयांपर्यंत खाली गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची आस होती. परंतु यावर्षी अधिवेशनाने शेतकºयांना काहीच दिले नाही. हरभरा, तुरीचे भाव यावर्षी वाढले नाही. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च जास्त झाला, त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता उलट दर कमी झाल्याने ‘शंभराचे साठ अन् गळ्याला फास’ अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.यावर्षी निसर्ग कोपला. पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने रब्बी पीक पूर्णत: भूईसपाट केले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून नेला. शेतकºयांवर आभाळ कोसळले. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांविरूद्ध उभी ठाकली असताना शेतकरी तग धरणार कसा, असा प्रश्न आता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.शेतमालाच्या दरवाढीवर शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु शेतमालाचे दर पूर्णत: कोसळल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बँकांकडून घेतलेले कर्ज भरणे कठीण झाले आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष संपणार कधी?शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. असे छातीठोकपणे अभिमानाने सांगितले जाते. ते खरेही आहे. परंतु आज शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून दरवाढीसाठी संघर्ष करतो. मात्र शेतकºयांचा हा टाहो कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही.शेतमालाला भाव द्या, दुसरे काहीही नको...शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे. दिवस-रात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला हा नरकयातनांचा संघर्ष थांबायलाही तयार नाही. आम्हाला फक्त भाव द्या. दुसरे काहीही नको, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सरकारने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिना’चे गाजर दाखविले. शेतकऱ्यांचे चांगले दिवस येईल, असा विश्वास देऊन सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी होरपळला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही.- बाबाराव पिंपळशेंडे,शेतकरी, वनोजा.