शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

शेतमालाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:52 IST

शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली.

ठळक मुद्देकापसाचे भाव पडले : सोयाबीन, हरभरा तुरीला मंदी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसवेना

प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली. शेतमालाचे वाढलेले भाव पूर्णत: घसरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू लागले आहे. त्यामुळे शेतकरीराजा मनाने मोडून पडला आहे.शेतकºयांचे दु:ख आज सर्वांनाच माहीत आहे. जगाचा पोशिंदाच कोलमडून पडला आहे. शेतकºयांची सारी शोभा शेतमालाच्या दरवाढीवर अवलंबून असते. त्यासाठी शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून उत्पादन वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु सर्व परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाली आहे. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो. यावर्षी कापसाचे भाव पाच हजार रुपयांच्या वर गेले होते. परंतू बोंडअळीचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव चार हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांना कापूस विकायला परवडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी तर दुसरीकडे दर पूर्णत: कोलमडल्याने शेतकरी पार हताश झाला आहे.आजघडीला कापसाचा सर्वाधिक पेरा असताना त्याच पांढऱ्या सोन्याचे दर एक हजार रुपयांपर्यंत खाली गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची आस होती. परंतु यावर्षी अधिवेशनाने शेतकºयांना काहीच दिले नाही. हरभरा, तुरीचे भाव यावर्षी वाढले नाही. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च जास्त झाला, त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता उलट दर कमी झाल्याने ‘शंभराचे साठ अन् गळ्याला फास’ अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.यावर्षी निसर्ग कोपला. पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने रब्बी पीक पूर्णत: भूईसपाट केले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून नेला. शेतकºयांवर आभाळ कोसळले. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांविरूद्ध उभी ठाकली असताना शेतकरी तग धरणार कसा, असा प्रश्न आता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.शेतमालाच्या दरवाढीवर शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु शेतमालाचे दर पूर्णत: कोसळल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बँकांकडून घेतलेले कर्ज भरणे कठीण झाले आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष संपणार कधी?शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. असे छातीठोकपणे अभिमानाने सांगितले जाते. ते खरेही आहे. परंतु आज शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून दरवाढीसाठी संघर्ष करतो. मात्र शेतकºयांचा हा टाहो कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही.शेतमालाला भाव द्या, दुसरे काहीही नको...शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे. दिवस-रात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला हा नरकयातनांचा संघर्ष थांबायलाही तयार नाही. आम्हाला फक्त भाव द्या. दुसरे काहीही नको, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सरकारने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिना’चे गाजर दाखविले. शेतकऱ्यांचे चांगले दिवस येईल, असा विश्वास देऊन सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी होरपळला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही.- बाबाराव पिंपळशेंडे,शेतकरी, वनोजा.