शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली.

ठळक मुद्देतातडीच्या मदतीची गरज : अनेक भागात ओला दुष्काळसदृश्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात संततधार पाऊस पडला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पुढच्या वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने पिकांचे आधी सर्वेक्षण करावे व शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी आता शेतकरी करू लागले आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली. अनेक दिवस हा पाऊस कायम राहिला. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव, मोठे सिंचन प्रकल्प तुडूंब भरले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांची पीक बचावले. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने आपली झड सुरू केली. आता ५ आणि ६ सप्टेबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस आला.ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. या पावसामुळे अनेक तलाव फुटले, सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. इरई धरणाचेही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरले. कापूस, सोयाबीन व धानपिके पाण्याखाली आली. चांगली भरात आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हे नुकसान भरून निघणारे नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीच्या बळावरच त्यांच्या कुटुंबांचा पुढील वर्षाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. महसूल विभागाने सर्वप्रथम जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करावे आणि तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.सर्वेक्षण विलंबाने झाल्यास नुकसानआता शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाली आहे. आताच महसूल विभागाने सर्वक्षण केले तर खरी परिस्थिती त्यांना कळेल. सर्वेक्षण उशिराने झाल्यास कितपत पिके उद्ध्वस्त झाली, याची अचुक माहिती महसूल कर्मचाऱ्यांना कळणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार नाही.गावात बसून सर्व्हे नकोजिल्ह्यात पिके पुराच्या पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणारी ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा वेळी महसूल कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केले नाही. गावातील चौकात बसून कागदपत्र रंगविण्यात आली. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. हा अनुभव पाठिशी असल्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती