शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली.

ठळक मुद्देतातडीच्या मदतीची गरज : अनेक भागात ओला दुष्काळसदृश्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात संततधार पाऊस पडला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पुढच्या वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने पिकांचे आधी सर्वेक्षण करावे व शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी आता शेतकरी करू लागले आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली. अनेक दिवस हा पाऊस कायम राहिला. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव, मोठे सिंचन प्रकल्प तुडूंब भरले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांची पीक बचावले. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने आपली झड सुरू केली. आता ५ आणि ६ सप्टेबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस आला.ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. या पावसामुळे अनेक तलाव फुटले, सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. इरई धरणाचेही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरले. कापूस, सोयाबीन व धानपिके पाण्याखाली आली. चांगली भरात आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हे नुकसान भरून निघणारे नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीच्या बळावरच त्यांच्या कुटुंबांचा पुढील वर्षाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. महसूल विभागाने सर्वप्रथम जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करावे आणि तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.सर्वेक्षण विलंबाने झाल्यास नुकसानआता शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाली आहे. आताच महसूल विभागाने सर्वक्षण केले तर खरी परिस्थिती त्यांना कळेल. सर्वेक्षण उशिराने झाल्यास कितपत पिके उद्ध्वस्त झाली, याची अचुक माहिती महसूल कर्मचाऱ्यांना कळणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार नाही.गावात बसून सर्व्हे नकोजिल्ह्यात पिके पुराच्या पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणारी ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा वेळी महसूल कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केले नाही. गावातील चौकात बसून कागदपत्र रंगविण्यात आली. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. हा अनुभव पाठिशी असल्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती