शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

निवडणुकीच्या काळात महाडीबीटी नोंदणीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आता महा़डीबीटी पोर्टवर शेतकरी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व ...

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आता महा़डीबीटी पोर्टवर शेतकरी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यापासून तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाहिजे तसा प्रतिसाद नसून ग्रामीण भागातील शेतकरी सध्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये गुंतले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे या रणधुमाळीत ग्रामीण भागातील शेतकरी सध्या गुंतले असून त्यांना अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, योजने संदर्भात आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना यासंदर्भात माहितीच नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही. आधार लिंक नसल्याने अर्ज भरताना अडचणीही येत आहे. त्यामुळे कंटाळून अनेक शेतकरी अर्ज भरत नसल्याचेही चित्र आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुुरु करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर इच्छुक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्यांना नोंदणी करता येते.

या योजनांसाठी आता एकच अर्ज

एका क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिचंन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत कृषी सिंचन योजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरडा मुंडा कृषी क्रांती योजना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना पसंतीनुसार निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

अशी करावी लागते नोंदणी

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधाड कार्डशी संलग्न करून महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल अथवा संगणकाद्वारे सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी आवाहन

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका क्लिकवर अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---

असे जोडावे लागणार कागदपत्रे

३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयंघोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

---

कोट

शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज कसा करावा यासाठी शेतकऱ्यांना माहिती नाही. केंद्रावर जावून अर्ज करण्यासाठी पैसा लागत असून शेतीकाम सोडून आणि पैसा खर्च करून अर्ज भरावा लागत आहे.

-पवन वाघमारे

शेतकरी, चंद्रपूर

--