शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:38 IST

तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे.

ठळक मुद्देआर्थिक बोजा वाढला : शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यात सात हजार ६७९ हेक्टर कृषी क्षेत्र निर्धारित करण्यात आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी पडणाºया पावसाने खंड पाडल्याने शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तालुक्यातील भात व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सात हजार ५०५.६० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी कापसाची तर दोन हजार ९८६.४० हेक्टर क्षेत्रात भाताचे लागवड केली. मात्र, कापसाने यावर्षी बळीराजाला जबर फटका दिला. गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता बळराजाला सतावत आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी, शेतमजूर यावरच वर्षभराच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतात. परंतु शेती मालाचे उत्पादन घटल्याने बळीराजाचे अवसान गळाले आहे. शेतीची मशागत करूनही उत्पादनात वाढ झाली होत नसल्याने हवालदील झाला आहे. कृषी क्षेत्रातील एकूण पीक पेरणी क्षेत्रापैकी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८८५.५० क्षेत्रात कापूस १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये भाजीपाली, ४९६.८० हेक्टरमध्ये तूर, दोन हजार ९८६.४० हेक्टरमध्ये भात तर केवळ १२८.४० हेक्टर सोयाबिन पिकांची लागवड केली. परंतु पर्जन्यमानाचा खंड पडल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला.अशातच बोंडअळीच्या आक्रमणाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. उचल केल्याच्या कर्जाची परतफेड कशी करावी. कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्र समोर आला आहे. यातून बळीराजाला सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूस