शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:38 IST

तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे.

ठळक मुद्देआर्थिक बोजा वाढला : शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यात सात हजार ६७९ हेक्टर कृषी क्षेत्र निर्धारित करण्यात आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी पडणाºया पावसाने खंड पाडल्याने शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तालुक्यातील भात व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सात हजार ५०५.६० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी कापसाची तर दोन हजार ९८६.४० हेक्टर क्षेत्रात भाताचे लागवड केली. मात्र, कापसाने यावर्षी बळीराजाला जबर फटका दिला. गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता बळराजाला सतावत आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी, शेतमजूर यावरच वर्षभराच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतात. परंतु शेती मालाचे उत्पादन घटल्याने बळीराजाचे अवसान गळाले आहे. शेतीची मशागत करूनही उत्पादनात वाढ झाली होत नसल्याने हवालदील झाला आहे. कृषी क्षेत्रातील एकूण पीक पेरणी क्षेत्रापैकी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८८५.५० क्षेत्रात कापूस १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये भाजीपाली, ४९६.८० हेक्टरमध्ये तूर, दोन हजार ९८६.४० हेक्टरमध्ये भात तर केवळ १२८.४० हेक्टर सोयाबिन पिकांची लागवड केली. परंतु पर्जन्यमानाचा खंड पडल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला.अशातच बोंडअळीच्या आक्रमणाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. उचल केल्याच्या कर्जाची परतफेड कशी करावी. कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्र समोर आला आहे. यातून बळीराजाला सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूस