शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:38 IST

तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे.

ठळक मुद्देआर्थिक बोजा वाढला : शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यात सात हजार ६७९ हेक्टर कृषी क्षेत्र निर्धारित करण्यात आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी पडणाºया पावसाने खंड पाडल्याने शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तालुक्यातील भात व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सात हजार ५०५.६० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी कापसाची तर दोन हजार ९८६.४० हेक्टर क्षेत्रात भाताचे लागवड केली. मात्र, कापसाने यावर्षी बळीराजाला जबर फटका दिला. गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता बळराजाला सतावत आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी, शेतमजूर यावरच वर्षभराच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतात. परंतु शेती मालाचे उत्पादन घटल्याने बळीराजाचे अवसान गळाले आहे. शेतीची मशागत करूनही उत्पादनात वाढ झाली होत नसल्याने हवालदील झाला आहे. कृषी क्षेत्रातील एकूण पीक पेरणी क्षेत्रापैकी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८८५.५० क्षेत्रात कापूस १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये भाजीपाली, ४९६.८० हेक्टरमध्ये तूर, दोन हजार ९८६.४० हेक्टरमध्ये भात तर केवळ १२८.४० हेक्टर सोयाबिन पिकांची लागवड केली. परंतु पर्जन्यमानाचा खंड पडल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला.अशातच बोंडअळीच्या आक्रमणाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. उचल केल्याच्या कर्जाची परतफेड कशी करावी. कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्र समोर आला आहे. यातून बळीराजाला सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूस