शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

शेतीच्या प्रगतीसाठी महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:24 AM

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांच्या शिवाराची होणार निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, रासायनिक खते, बियाणे आणि शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या हेतुने यापूर्वीदेखिल कृषी विभागाने योजना तयार केल्या होत्या. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे योजना कागदावरच राहिल्या. याचा अनिष्ठ परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेतात. त्यामुळे फारसे उत्पादन हाती येत नाही. ऐन हंगामाच्या कालावधीत योग्य मार्गदर्शनाअभावी चुकीचे बियाणे वापरले जाते, याचा फटका शेतकºयांना बसतो.गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाबाबत हा प्रकार घडला. भद्रावती, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला. या हंगामात जिल्ह्यातील काही निवडक शेतकºयांच्या शेती शिवारात शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेला अधिकाधिक महिला शेतकरी उपस्थित राहतील, यादृष्टीने कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.प्रत्येक शेती शाळेसाठी १४ हजारांची तरतूदजिल्ह्यातील शेती शाळेसाठी शासनाने १४ हजार रूपयांची तरतूद केली आहे. कृषी सहाय्यकांकडून क्रापसॅफद्वारे निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात शिवारात ही शेतीशाळा होईल. कार्यशाळा पार पडल्यानंतर संबंधित अहवाल नोंदणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेची जबाबदारी आत्मावर सोपविण्यात आली आहे.