शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अतिपावसाने शेतकऱ्यांना तोंडचा घास हिरावण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस पिकावर होणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जून महिन्यात ...

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस पिकावर होणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जून महिन्यात पाऊस समाधानकारक पडत असल्याने बळिराजाने पेरणी व टोकन पद्धतीने पूर्ण रानात बी टाकले आहे; परंतु आता तेच पीक कापणीला आले असताना सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काळे पडून सडण्याच्या मार्गावर आहे.

आजपर्यंत सोयाबीन पिकांना पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीला डवरणी, खुरपणी, निंदण वेळोवेळी केली आहे. सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी खोडमशी, चक्री भुंगा, उंट अळी, तंबाखूतील पाने खाणारी अळी, पाने पोखरणारी अळी, फुलकिडे, मावा, तुडतुडा, पांढरी माशी आदी किडींचे व्यवस्थापन केले आहे. कृषी विभागाचा सल्ला घेऊन खोडमशी व चक्री भुंगासाठी पीक १५ ते २२ दिवसांचे असताना कीटनाशकाची फवारणी केली. फुलोरा अवस्थामध्ये अळीचा प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होऊ नये म्हणून दुसरी फवारणी केली होती. मुलाबाळाप्रमाणे पिकाची जोपासना केली आहे.

आता संपूर्ण पीक हे कापणीला झाले आहे, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची सतत रिपरिप बघून पीक हातात येईल की नाही या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या शेंगाची भरणी बघून यावर्षी उत्पन्नात वाढ होईल अशी आशा बाळगली होती, पण सततच्या पावसामुळे शेंगा सडून पीक पूर्णत्वास वाया जाण्याची स्थिती आहे. लागवडीसाठी आजपर्यंतचा केलेला खर्चही निघेल की नाही या चिंतेत शेतकरी आहे.

कोट

सोयाबीन पीक कापणीला आले आहे; परंतु सतत सुरू असलेल्या पावसामुळे तोंडात आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्ज काढून पिकाची लागवड केली. आता त्याच कर्जाचा भरणा कसा करायचा, हा प्रश्न पडलेला आहे.

- पंढरी वासुदेव उपरे, शेतकरी, पळसगाव.

200921\img20210918152621.jpg~200921\img20210918152608.jpg

caption~caption