शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नदीकाठावरील बळीराजा हवालदिल; शेतात फसलेले खत वाचविण्यासाठी डोंग्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 12:21 IST

गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे.

ठळक मुद्देगोंडपिपरी तालुक्यातील विदारक चित्र

राजेश माडुरवार

चंद्रपूर : शेतात पाणी, घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलं. जिथे माणस पुरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. तिथे हा बळीराजा शेतातील खत सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माणूसभर पुरात उतरला आहे. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे.

तेलंगणा सीमेवरील वर्धा नदीला आलेल्या पुरातील पाण्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्याखाली गेली. पूर वाढतच आहे. त्यामुळं उर्वरीत शेती पाण्याखाली वाढण्याचा धोका वाढला आहे. शेतपिकांना खत टाकण्यासाठी खत पूर्वीच शेतात नेल्या गेलं होतं. अशावेळी नदीची पातळी वाढत असल्याने खत पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला होता. यातच डोग्यांने पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत वाचविण्यासाठी धडपड करीत आहे.

पिके पाण्याखाली असून ती कुजण्याचा धोका वाढला आहे. अशावेळी दुबारपेरणी केल्यावर किमान सध्यातरी उरलेसुरले खत कामी येईल, ही आशा बळीराजाला आहे. त्यामूळं जिवघेण्या पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत सुरक्षितस्थळी हलवित आहे. मात्र त्यांचा हा डोंग्यावाटे होणारा प्रवास जीवघेणा ठरला आहे. या पुराचा फटका अडेगांव, दरुर, नंदवर्धन, शिवणी देशपांडे, पानोरा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

गोंडपिपरी तालुक्याच्या सिमावर्ती भागातील गावकऱ्यांनी काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी सुद्धा हवामानाचा अंदाज घेऊन पाऊले उचलावी.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे सुरु आहेत.

- के.डी.मेश्राम,तहसिलदार,गोंडपिपरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसchandrapur-acचंद्रपूरfloodपूर