शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नदीकाठावरील बळीराजा हवालदिल; शेतात फसलेले खत वाचविण्यासाठी डोंग्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 12:21 IST

गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे.

ठळक मुद्देगोंडपिपरी तालुक्यातील विदारक चित्र

राजेश माडुरवार

चंद्रपूर : शेतात पाणी, घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलं. जिथे माणस पुरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. तिथे हा बळीराजा शेतातील खत सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माणूसभर पुरात उतरला आहे. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे.

तेलंगणा सीमेवरील वर्धा नदीला आलेल्या पुरातील पाण्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्याखाली गेली. पूर वाढतच आहे. त्यामुळं उर्वरीत शेती पाण्याखाली वाढण्याचा धोका वाढला आहे. शेतपिकांना खत टाकण्यासाठी खत पूर्वीच शेतात नेल्या गेलं होतं. अशावेळी नदीची पातळी वाढत असल्याने खत पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला होता. यातच डोग्यांने पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत वाचविण्यासाठी धडपड करीत आहे.

पिके पाण्याखाली असून ती कुजण्याचा धोका वाढला आहे. अशावेळी दुबारपेरणी केल्यावर किमान सध्यातरी उरलेसुरले खत कामी येईल, ही आशा बळीराजाला आहे. त्यामूळं जिवघेण्या पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत सुरक्षितस्थळी हलवित आहे. मात्र त्यांचा हा डोंग्यावाटे होणारा प्रवास जीवघेणा ठरला आहे. या पुराचा फटका अडेगांव, दरुर, नंदवर्धन, शिवणी देशपांडे, पानोरा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

गोंडपिपरी तालुक्याच्या सिमावर्ती भागातील गावकऱ्यांनी काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी सुद्धा हवामानाचा अंदाज घेऊन पाऊले उचलावी.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे सुरु आहेत.

- के.डी.मेश्राम,तहसिलदार,गोंडपिपरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसchandrapur-acचंद्रपूरfloodपूर