शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

शेतकऱ्यांनो ३० जून पर्यंत 'केवायसी' करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:30 IST

Chandrapur : वर्ष लोटूनही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित; 'केवायसी' अभावी २०३२ शेतकऱ्यांची आर्थिक मदत थांबली

बी. यू. बोर्डेवारलोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : मागील वर्षी जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. शासनातर्फे दिले जाणारी आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांचे बँक खात्याची 'केवायसी' झाली नसल्यामुळे जमा झालेले नाही. यात राजुरा तालुक्यातील केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजार ३२ एवढी आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आलेले लाखो रुपये 'केवायसी' अभावी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.

मागील खरीप हंगामामध्ये जुलै ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे नदी व नाल्याकिनारी असणाऱ्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्यामुळे उभी पिके नष्ट झालेली होती.

यात नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याबाबत महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केलेले होते. तालुक्यात पाच हजार ७६५ लाभार्थ्यांना शासनातर्फे आर्थिक लाभ मिळणार होता. गाळ साचून, जमीन खरवडून व अतिपावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. यामध्ये आतापर्यंत दोन हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे, तर एक हजार ४७८ शेतकऱ्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही दिवसांत रक्कम जमा होणार आहे; मात्र अजूनही तब्बल दोन हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम ही शासनाकडे अजूनही जमा आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम शासनाला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. 

तांत्रिक अडचणीच्या नावावर तब्बल वर्षभरानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी हतबल आहेत. जेमतेम आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

संमतीपत्र नसलेल्यांनाही मदत नाहीयाशिवाय सामायिक खातेदारांचे संमतीपत्र नसल्यामुळेही शासनाकडून मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची माहिती आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी झालेली आहे, तर दुसरीकडे मागील वर्षीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानभरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा आर्थिक संकटात बळीराजा सापडल्या असल्याने आता 'केवायसी'चे नवीन संकट त्यांच्यासमोर उभे आहे.

तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी जुलै, ऑगस्ट २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वाटप प्रक्रिया शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन डीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २२५५ शेतकरी बांधवांना अनुदान रक्कम प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा झाली असून १४७८ शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झाली असून लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा होईल.- डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर