शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

हस्त नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली.

ठळक मुद्देवरूणराजा आता तरी थांब : भात पिकासह भाजीपाला पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने सर्वसामान्यच नाही, तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरूण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उत्तरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसामुळे भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आले आहे.गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली. नदी, नाल्यांच्या तिरावरील शेतशिवाराला पुराचा फटका बसला. यामुळे शेतकरी आता धास्तावले आहे. महिन्याभरात असा एकही दिवस गेला नाही की, पाऊ स आला नाही. शनिवार, रविवार तसेच सोमवारी रात्री शहरासह जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. हस्त नक्षत्रातील पावसात प्रचंड विजेचा कडकडाटही सुरु होता.रोगांचा प्रादूर्भावचंद्रपूर : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कीटनाशकाची फवारणी केली आहे. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.दुष्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात अतिवृष्टीचे सावट आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाने सर्वेक्षण केले नसल्याची ओरड शेतकऱ्यांची असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती