शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सोयाबीनच्या अल्प दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले.

ठळक मुद्देमळणीला वेग : शासकीय मदतीची आता प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने विश्रांती घेतली असून सोयाबीनच्या मळणीला वेग आला आहे. ढगाळी वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती आहे. या पावसामुळे सोयाबीनलाही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले. मध्यंतरी झालेल्या पावसाने सोयाबीनला फटका बसला होता. ऐन काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते विक्रीसाठी तयार केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. सद्या व्यापाऱ्याकडून दोन हजार २०० रुपये ते तीन हजार रुपये दर दिल्या जात आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून विविध कारणे सांगून कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात घटजिल्ह्यात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. सद्यस्थितीत बाजारपेठेत अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत आहे. परतीच्या पावसात भिजल्याने सोयाबीनमध्ये असलेल्या ओलाव्याने दर कमी झाल्याचे कारण सांगितले जात असून त्यापेक्षाही कमी दरात खरेदी सुरू आहे. शिवाय वजनातही घट होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत काही व्यापारीही भाव पाडून शेतकऱ्याची पिळवणूक करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती