शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या अल्प दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले.

ठळक मुद्देमळणीला वेग : शासकीय मदतीची आता प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने विश्रांती घेतली असून सोयाबीनच्या मळणीला वेग आला आहे. ढगाळी वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती आहे. या पावसामुळे सोयाबीनलाही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले. मध्यंतरी झालेल्या पावसाने सोयाबीनला फटका बसला होता. ऐन काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते विक्रीसाठी तयार केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. सद्या व्यापाऱ्याकडून दोन हजार २०० रुपये ते तीन हजार रुपये दर दिल्या जात आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून विविध कारणे सांगून कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात घटजिल्ह्यात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. सद्यस्थितीत बाजारपेठेत अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत आहे. परतीच्या पावसात भिजल्याने सोयाबीनमध्ये असलेल्या ओलाव्याने दर कमी झाल्याचे कारण सांगितले जात असून त्यापेक्षाही कमी दरात खरेदी सुरू आहे. शिवाय वजनातही घट होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत काही व्यापारीही भाव पाडून शेतकऱ्याची पिळवणूक करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती