शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले.

ठळक मुद्देमशागतीसह पेरणीला सुरुवात : पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सद्या चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. आता याच हंगामावर शेतकऱ्यांची धुरा अंवलबून आहे. खरीप हंगामात शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यांना पैसा गोळा करताना कसरत करावी लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले. शेतकऱ्यांचे पुढील नियोजन हे खरीप पिकांच्या उत्पादनावर असते. मात्र नगदी पिके समजल्या जाणाऱ्यां सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन फसले. त्यातच सध्या रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची रब्बी पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्याती शेकडो शेतशिवारात रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाच्या पेरणीसाठी पेरणीपूर्वी मशागतीला वेग आला आहे. शेतीसाठी बियाणे, खते विकत घेण्याचीसुद्धा लगबग सुरु झाली. शेती मशागतीपासून तर बियाण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अनुदानावर बियाणे देण्याची मागणीखरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बियाणे घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याचे चित्र आहे. पैशांअभावी अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळरब्बी हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्यात आली असून पेरणी वेळेवर करण्यासाठी शेतकºयांनी खत, बियाण्याची जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा फटका बसल्याने त्यांच्याकडे रब्बी हंगामासाठी पैसे उरले नाहीत. बँकेच्या दारात गेले असता बँकांकडूनही पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पेरणीसाठी बि-बियाण्याची जमवाजमव कशी करावी, याचीही अनेक शेतकºयांना चिंता सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेती