शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जनावरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:53 IST

आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देएकाच वेळी तीन जनावरे मृत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सदर घटना गेवरा खुर्द येथील असून रविवारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपाापली जनावरे चरायला सोडली. सायंकाळी घराकडे परततांना गावाशेजारीच दोन गायींचा मृत्यू झाला तर दोन बैलांपैकी घरी पोहताच एकाचा मृत्यू झाला. काही कळण्याचे आत एका पाठोपाठ तीन जनावरांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकºयांत भीती निर्माण झाली आहे. लागलीच विहीरगाव येथील पशुधन विकास अधिकाºयांना माहिती देण्यात आली. अत्यवस्थ असलेल्या बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. मृत जनावरांच्या मालकांमध्ये सुमाजी आकू रामटेके व विलास लक्ष्मण भगत यांची प्रत्येकी एक गाय व जीवनदास सावजी वाढणकर यांच्या मालकीचा बैल होता तर चौथा बैल गजानन तुकाराम चौधरी यांच्या मालकीचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृत्यूचे कारण कळू शकले नसले तरी याबाबत सावलीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. जुनेजा यांना माहिती कळविण्यात आली. वृत्त लिहिपर्यंत मृत जनावरांचा मृत्यूबाबत स्थानिक डॉक्टरांनी केवळ विषबाधेची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. एकाच वेळी एकाच गावात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने या घटनेमागील खरे कारण आवश्यक झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.मृत्यूचे कारण अस्पष्टचरायला गेलेल्या तीन जनावरांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्यी भीती निर्माण झाली आहे. सदर जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला, या जनावरांनी काय खाल्ले होते, सर्पदंशाचा तर प्रकार नाही ना, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.