शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकरी व पशुधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST

नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशुधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. ...

नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशुधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या ४२ घटना नागभीड वनपरिक्षेत्रातच घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.

नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी तळोधी (बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी, जनकापूर, बाळापूर, देवपायली, बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, मौशी, ढोरपा, बालापूर खुर्द, पाहार्णी, म्हसली, कोरंबी, डोंगरगाव, नवखळा आदी परिसर, तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दिवसाढवळ्या दर्शन झाले आहे.

उल्लेखनीय बाब ही की, या व याशिवाय अन्य अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेती या जंगलाला लागून आहे. शेती आणि पशुधनाच्या निमित्ताने या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. यातूनच वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.

बॉक्स

आतापर्यंत असे झाले हल्ले

नागभीड वनपरिक्षेत्रात एप्रिल महिन्यापासून १४ व्यक्तींवर रानटी डुकरांनी हल्ले केले आहेत. दोन व्यक्तींवर बिबट्यांनी, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २६ जनावरे जखमी व मृत्युमुखी पडली असल्याची माहिती आहे. या घटना केवळ घटनाच नाही तर या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. हे होऊ नये यासाठी शासनाने उपाययोजना करायला हव्यात.

बॉक्स

तळोधी वनपरिक्षेत्र संवेदनशील

नागभीड वनपरिक्षेत्राच्या तुलनेत तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. गेल्या चार महिन्यांत या वनपरिक्षेत्रात वाघाने थेट व्यक्तींवर हल्ला करून ठार केल्याच्या चार घटना आहेत. यात कोजबी माल येथील सरपणासाठी गेलेली व्यक्ती, मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेली महिला आणि आकापूर व वाढोणा येथील दोन गुराख्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रातही अन्य वन्य प्राण्यांकडून पशुधनावर, व्यक्तींवर हल्ला करून ठार किंवा जखमी केल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, या घटनांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.