शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वरोऱ्यातील शेतकऱ्यांना गोंडपिपरीतून मोबदला

By admin | Updated: October 12, 2014 23:42 IST

शासनाने सिंचन व्यवस्था करण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी एका

वरोरा : शासनाने सिंचन व्यवस्था करण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी एका नोटीसद्वारे गोंडपिपरीच्या उपविभागीय कार्यालयात बोलावले आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी शंभर किलोमिटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांना या नोटीसबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.वरोरा तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनीची कालव्यासाठी सन २००५-०६ मध्ये शासनाच्यावतीने निवड करण्यात आली. कालव्यात जाणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या विशेष भुसंपादन कार्यालयाने दरही निश्चित करून शेतातील सीमा निश्चित केली. कालवा शेतातून जात असल्याने शेताचे दोन तुकडे पडतात, तर काही शेतात निम्यापेक्षा अधिक भाग कालव्यात गेल्याने ती शेती कसण्यायोग्य राहणार नाही. दोन तुकडे वाहितीमध्ये कसे आणावे, असा प्रश्न निर्माण झाला. मिळणारे अनुदानही आजच्या तुलनेत कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांची अनुदानाची उचल केली नाही. गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवून भुसंपादनाचा निवाडा पारित केला. भुसंपादन कायदा कलम १२/२७ या नोटीसद्वारे तुम्हास तुमच्या मालकी हक्काच्या संपादीत जमिनीचा मोबदला उचलण्यासाठी कळविण्यात आले; परंतु रक्कम उचल केली नाही. त्यामुळे नमुद तारखेला उपविभागीय अधिकारी तथा विशेष भुसंपादन अधिकारी गोंडपिपरी कार्यालयात उपस्थित रहावे. रक्कम उचलण्यासाठी उपस्थित न झाल्यास सदर रक्कम शासन जमा करण्यात येईल आणि शासनाकडून एकतर्फी ताबा घेण्यात येईल. यानंतर आपला कोणताही उजर राहणार नाही, असेही नोटीसमध्ये नमुद केले आहे. वरोरा येथील उपविभागीय कार्यालय किंवा चंद्रपूर शहरात वरिष्ठ कार्यालय असताना मोबदल्यासाठी गोंडपिपरी येथे बोलाविण्यात आल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.(तालुका प्रतिनिधी)