शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अपार मेहनत आणि जिद्दीच्या बळावर फुलविली झेंडूची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:52 IST

यशकथा : राजुरा तालुक्यातल्या गोवरी येथील रामदास बोथले या प्रगतिशील शेतकऱ्याने अपार मेहनत व प्रचंड जिद्दीच्या बळावर काळ्या कसदार मातीत झेंडूची शेती करीत शेतात पिवळे रान फुलविले आहे.

- प्रकाश काळे (गोवरी, जि. चंद्रपूर)

शेतीला आज कुणाचीच साथ उरली नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावरच अवकळा आली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. काळ्या कसदार मातीत सोन्यासारखा शेतमाल पिकवूनही त्याला साजेसा दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असतानाच जे चांगल्या दराने बाजारात विकले जाते तेच आता शेतात पिकविले पाहिजे, या उदात्त हेतूने झपाटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या गोवरी येथील रामदास बोथले या प्रगतिशील शेतकऱ्याने अपार मेहनत व प्रचंड जिद्दीच्या बळावर काळ्या कसदार मातीत झेंडूची शेती करीत शेतात पिवळे रान फुलविले आहे.

शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरविणाराही कुणी उरला नाही. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती अगदी वाईट आहे. त्यामुळे हतबल झालेला राजुरा तालुक्याच्या गोवरी येथील प्रगतिशील शेतकरी रामदास बोथले यांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत झेंडूच्या फुलांची शेती केली. त्यांनी आपल्या एकरभर शेतात ५ हजार झेंडूच्या फुलांची रोपे लावली. झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांनी झेंडूची शेती करण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथून त्यांनी झेंडूच्या फुलांचे बीज आणून त्याची लागवड केली आहे.आजघडीला झेंडूच्या फुलांची एक एकरातील शेती चांगलीच बहरली आहे. दिवाळी व सणासुदीच्या दिवसात ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी रामदास बोथले यांचे म्हणणे आहे. 

रामदास बोथले यांची राजुरा-पोवनी मार्गावर गोवरी येथे मुख्य मार्गालगत ३ एकर शेती आहे. त्यापैकी एका एकर शेतीत झेंडूची फुले, तर दोन एकर शेतात ते भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. दरवर्षी रामदास बोथले हे ३ एकर शेतात कपासीचे उत्पादन घ्यायचे; मात्र कपासीवर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. त्या तुलनेत उत्पादन कमी व्हायचे. कापसाला दर अल्प असल्याने कापसाची शेती परवडत नव्हती. त्यामुळे ते हताश झाले होते. दिवस-रात्र शेतात काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक उरत नाही. केलेली मेहनत वाया जाते. केलेला खर्च भरून निघत नसल्याने त्यांनी आधुनिक शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत झेंडूची शेती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

नापिकीने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर झेंडूची शेती करीत शेतकऱ्यांना शेतातील नवी वाट चोखाळायला लावणारी नवी उमेद या प्रगतिशील शेतकऱ्याने दिली. परिस्थितीला शरण न जाता संकटावर मात करून प्रचंड जिद्दीच्या बळावर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. बाजारात चांगल्या दराने जे विकले जाते तेच आता शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. असा मानस रामदास बोथले या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी