शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मूल तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 17:09 IST

चिरोली परिसरात दहशतीचे वातावरण

मूल (चंद्रपूर) : शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. येवनाथ विकरू चुनारकर (७५, रा. चिरोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

येवनाथ चुनारकर हे नेहमीप्रमाणे शेतात धान पिकाला पाणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. ही घटना चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहायक मस्के, खनके, पडवे, घागारघुंडे, वनरक्षक राकेश गुरनुले, मरसकोले, रोघे, मानकर, शीतल व्यहाडकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला वनविभागमार्फत कुटुंबांना तत्काळ ३० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याने चिरोली परिसरात दहशत पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूTigerवाघFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर