शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

निवृत्त वनाधिकाऱ्याने सोडला वीज प्रवाह; शेतकऱ्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 11:57 IST

विजेच्या धक्क्याने रानडुकराचाही मृत्यू : निवृत्त वनाधिकारी लेनेकरला अटक

नागभीड (चंद्रपूर) : शेतीच्या संरक्षणासाठी जिवंत वीज प्रवाहाचा उपयोग न करता सोलर प्रणालीचा वापर करा, अशी जनजागृती वन विभागाकडून सुरू असताना निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने आपल्या शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाने नागभीड येथील शेतकऱ्याचा तडफडून मृत्यू झाल्याची भीषण घटना बुधवारी चिखलपरसोडी शिवारात उघडकीस आली. गुरुदेव श्रीहरी पिसे (५२, रा. नागभीड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण दामोधर लेनेकर यांना आज अटक केली.

नागभीड येथील मृत शेतकरी गुरुदेव पिसे आणि आरोपी वनाधिकारी नारायण लेनेकर यांची धानाची शेती चिखलपरसोडी शिवारात एकमेकाला लागून आहे. मंगळवारी सांयकाळी गुरुदेव पिसे हे आपल्या शेतातील पीक बघण्यासाठी शेतात गेले होता. मात्र, घरी परत आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री ८ वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर शेतात जाऊन पाहणी केली; पण अंधारामुळे काहीच दिसून आले नाही. कुटुंबाने बुधवारी सकाळी पुन्हा शेतात जाऊन शोध घेतला असता गुरुदेव पिसे यांचा मृतदेह वीज तारांमध्ये आढळला.

आरोपी वनाधिकाऱ्याच्या शेतातून तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याचे दिसून आले. या तारांजवळ एक रानडुकरही ठार झाल्याचे दिसून आले. हे भीषण दृश्य पाहताच क्षणी कुटुंबीय हादरले. त्यांनी लगेच ही माहिती पोलिस, महावितरण व वनविभागाला दिली. काही वेळातच तिन्ही विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी निवृत्त वनाधिकारी नारायण लेनेकर यांच्याविरूद्ध भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज नागभीड न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वनविभागानेही आरोपीविरुद्ध कलम ९,३९,४१ अन्वये गुन्हा दाखल केला. महावितरण विभागाने या घटनेचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.

नोकरीत असताना वाटले लोकांना ब्रह्मज्ञान

वन विभागात नोकरी करताना वन्यजीव, वनसंपदा, पीक आणि शेतकरी यांची काळजी घेण्याबाबत वारंवार प्रशिक्षण दिले जाते. वन परिक्षेत्र अधिकारीसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. समाज त्यांच्याकडे आदराने बघतो सेवेत असताना हे अधिकारी लोकांना ब्रह्मज्ञान वाटत असतात. मात्र, वन विभागातील निवृत्त वनाधिकाऱ्याच्या अक्षम्य चुकीने शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'त्या' आरोपीलाही अटक

मंगळवारी विजेच्या धक्क्याने देवनाथ रामदास बावनकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दुर्गेश रामकृष्ण सहारे (१८, रा. नागभीड) याला अटक केली. आरोपी दुर्गेश सहारे याने पिकांसाठी कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. शेजारीच शेतकरी देवनाथ बावनकर शेतात गेला असता तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी दुर्गेश सहारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

शेतकऱ्यांनी शेतीच्या संरक्षणासाठी जिवंत विद्युत प्रवाहाचा उपयोग न करता सोलर प्रणालीचा वापर केला पाहिजे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभाग लवकरच तालुक्यातील शिवारात शोध मोहीम राबवणार आहे.

- योगेश घारे, ठाणेदार नागभीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर