शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

रंगीबेरंगी साड्यांनी नटले शेतशिवार; वन्यप्राण्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 11:05 AM

राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तापमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुके हे सर्व असतानाच वन्यप्राण्यांपासून शेताची होणारी नासधूस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केला असून रंगीबेरंगी साड्यांनी शेतशिवार सजवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड बघायला मिळत आहे.महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधीअवकाळी पाऊस तर कधी ढगाळी वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कापूस, सोयाबिन, हरभरा उत्पादक ढगाळ वातावरणामुळे चिंतेत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच चार दिवसापूर्वी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे धुक्याची दाट चादर पसरत आहे. हे सर्व संकट असतानाच वन्यप्राण्यांमुळेही शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून हरभरा तसेच गहु पिकाच्या संरक्षमासाठी शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटकायंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांचे लागवड केली. मात्र वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि वातावरणातील बदलामुळे ते त्रस्त झाले आहे. शेतकरी शेती जगविण्यासाठी फवारणीसाठी मोठा खर्च करीत आहेत. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करुन पिके जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की, काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :agricultureशेती