शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

अड्याळ टेकडीचा चेहरामोहरा बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:24 AM

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.

ठळक मुद्देवारसा नागभीड तालुक्याचा

नागभीड : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्षे मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर निघाले. संबंध महाराष्ट्र व देशात दादाच्या समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवर त्यांनी विशेष लक्ष पुरविले. टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक गाव निर्माण केले. त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा महान आणि आदर्श समाजसेवकाचे ८ जून २००६ रोजी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर झाले. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे शिवशंकर पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपल्यात काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली त्या ठिकाणी दादाच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थेने दोन कोटी रूपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादाच्या समाधीस्थळांचे बांधकाम हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर राजस्थानातूनच मागविण्यात आले होते. या समाधी स्थळाव्यतिरिक्त आणखी इतर विविध बांधकामे करण्यात आली. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल जलाशय, पुष्पवेली आणि विविध प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आता सेवास्थळ झाली आहे. टेकडीवरी विलोभनीय बांधकामाने सौंदर्यात भर टाकली. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत तिथे सभागृह बांधण्यात आले. आणखी लहान-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामाने अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीवर सुरू असलेले विविध उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारी आहेत.गीताचार्य तुकाराम दादानी राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून शेकडो विधायक कामे केली. सामान्यांच्या हितासाठी झटले. ग्रामगीतेतील विचार आचरणात आणला. लोकांचे प्रबोधन करून चांगल्या मार्गाला लावले.-घनश्याम नवघडे