शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गरिबांपर्यंत आयुष्यमान योजनेचा लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:54 IST

‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : ५ लाखांपर्यंत मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ग्रामपंचायत सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, विजय राऊत, मनपा स्थायी समितीचे राहुल सराफ आदी उपस्थित होते.आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील १६ लोकांना या योजनेअंतर्गत गोल्ड कॉर्ड वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष्यमान ना. अहीर म्हणाले, भारत ही योजना आरोग्याशी संबंधित असणारी विमा योजना आहे. याअंतर्गत गरीबी रेषेखालील व अन्य सर्व जनतेला ६६१ आजारांसाठी विमा कवच बहाल करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत उपचारासाठी मदत केली जाणार आहे.यासाठी प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर उभारण्यात येणार आहे. सेतू केंद्र व ग्रामपंचायतमधून नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार कुटुंबान्ाां यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. १० ते १२ लाख नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात चंद्रपूर व नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाप्रसंगी सीएससीचे महाराष्ट्र प्रमुख समीर पाटील, प्रकल्प प्रमुख निलेश कुंभारे, जिल्हा प्रबंधक रमजान शेख, अनिरूद्ध डहाके, स्वप्नील सोनटक्के व संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. संचालन उद्धव पुरी यांनी केले.विम्याचे कवचजिल्ह्यात १ जानेवारीपासून आयुष्यमान योजनेचा शुभारंभ झाला आहे. ही योजना दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे. लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायत व सेतू केंद्रातील केंद्रचालकांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहीर