शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गरिबांपर्यंत आयुष्यमान योजनेचा लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:54 IST

‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : ५ लाखांपर्यंत मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ग्रामपंचायत सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, विजय राऊत, मनपा स्थायी समितीचे राहुल सराफ आदी उपस्थित होते.आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील १६ लोकांना या योजनेअंतर्गत गोल्ड कॉर्ड वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष्यमान ना. अहीर म्हणाले, भारत ही योजना आरोग्याशी संबंधित असणारी विमा योजना आहे. याअंतर्गत गरीबी रेषेखालील व अन्य सर्व जनतेला ६६१ आजारांसाठी विमा कवच बहाल करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत उपचारासाठी मदत केली जाणार आहे.यासाठी प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर उभारण्यात येणार आहे. सेतू केंद्र व ग्रामपंचायतमधून नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार कुटुंबान्ाां यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. १० ते १२ लाख नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात चंद्रपूर व नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाप्रसंगी सीएससीचे महाराष्ट्र प्रमुख समीर पाटील, प्रकल्प प्रमुख निलेश कुंभारे, जिल्हा प्रबंधक रमजान शेख, अनिरूद्ध डहाके, स्वप्नील सोनटक्के व संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. संचालन उद्धव पुरी यांनी केले.विम्याचे कवचजिल्ह्यात १ जानेवारीपासून आयुष्यमान योजनेचा शुभारंभ झाला आहे. ही योजना दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे. लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायत व सेतू केंद्रातील केंद्रचालकांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहीर