शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:55 IST

बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती. गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्दे२०० कर्मचाऱ्यांना दिलासा : प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती.गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाची किंमत कोट्यवधी रूपयांनी वाढली. बांधकामात गैरव्यहार झाल्याने काही अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. चौकशीचा अहवालही अद्याप पूर्ण झाला नाही. कालवा आणि प्रकल्पाशी पूरक अन्य कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर खर्च वाढतच आहे. सद्यस्थितीत डावा आणि उजवा कालव्याची कामे काही प्रमाणात झाली. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत हमखास पाणी जाऊ शकेल, याची आजही खात्री नाही. रेंगाळलेली कामे पूर्ण व्हावी, यासाठी गोसेखुर्द मंडळ नागपूर अंतर्गत येणारे सात विभाग व उपविभाग कार्यालयामध्ये ८४० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यातील सुमारे २०० कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत, अशी माहिती सुत्राने दिली.या कर्मचाऱ्यांना सरकारने अस्थायी ठेवले होते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर झाला होता. जलसंपदा विभागाने अस्थायी स्वरूपातील पदांना मान्यता देण्यासाठी मोठी दिरंगाई केली. एवढेच नव्हे तर उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांवर कार्यरत असणाऱ्यांनाही अभय दिले नाही. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. प्रशासकीय गतिमानता येण्यासाठी कर्मचाºयांना पाठबळ देणे गरजेचे होते.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीतगोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग १४, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग २ सावली तसेच उपविभाग ७, ८ व ९ मध्ये सुमारे ७० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नागभीड, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, तालुक्यातही, कर्मचाºयांच्या फौजफाटा आहे. यातील बहुतेक कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना मुदतवाढ दिल्याने सुखावले तर दुसरीकडे गोसीखुर्दचे पाणी मिळण्यासाठी थंडबस्त्यातील कामे पूर्ण होतील, ही आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.