शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:55 IST

बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती. गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्दे२०० कर्मचाऱ्यांना दिलासा : प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती.गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाची किंमत कोट्यवधी रूपयांनी वाढली. बांधकामात गैरव्यहार झाल्याने काही अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. चौकशीचा अहवालही अद्याप पूर्ण झाला नाही. कालवा आणि प्रकल्पाशी पूरक अन्य कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर खर्च वाढतच आहे. सद्यस्थितीत डावा आणि उजवा कालव्याची कामे काही प्रमाणात झाली. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत हमखास पाणी जाऊ शकेल, याची आजही खात्री नाही. रेंगाळलेली कामे पूर्ण व्हावी, यासाठी गोसेखुर्द मंडळ नागपूर अंतर्गत येणारे सात विभाग व उपविभाग कार्यालयामध्ये ८४० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यातील सुमारे २०० कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत, अशी माहिती सुत्राने दिली.या कर्मचाऱ्यांना सरकारने अस्थायी ठेवले होते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर झाला होता. जलसंपदा विभागाने अस्थायी स्वरूपातील पदांना मान्यता देण्यासाठी मोठी दिरंगाई केली. एवढेच नव्हे तर उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांवर कार्यरत असणाऱ्यांनाही अभय दिले नाही. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. प्रशासकीय गतिमानता येण्यासाठी कर्मचाºयांना पाठबळ देणे गरजेचे होते.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीतगोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग १४, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग २ सावली तसेच उपविभाग ७, ८ व ९ मध्ये सुमारे ७० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नागभीड, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, तालुक्यातही, कर्मचाºयांच्या फौजफाटा आहे. यातील बहुतेक कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना मुदतवाढ दिल्याने सुखावले तर दुसरीकडे गोसीखुर्दचे पाणी मिळण्यासाठी थंडबस्त्यातील कामे पूर्ण होतील, ही आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.