शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:55 IST

बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती. गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्दे२०० कर्मचाऱ्यांना दिलासा : प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती.गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाची किंमत कोट्यवधी रूपयांनी वाढली. बांधकामात गैरव्यहार झाल्याने काही अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. चौकशीचा अहवालही अद्याप पूर्ण झाला नाही. कालवा आणि प्रकल्पाशी पूरक अन्य कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर खर्च वाढतच आहे. सद्यस्थितीत डावा आणि उजवा कालव्याची कामे काही प्रमाणात झाली. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत हमखास पाणी जाऊ शकेल, याची आजही खात्री नाही. रेंगाळलेली कामे पूर्ण व्हावी, यासाठी गोसेखुर्द मंडळ नागपूर अंतर्गत येणारे सात विभाग व उपविभाग कार्यालयामध्ये ८४० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यातील सुमारे २०० कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत, अशी माहिती सुत्राने दिली.या कर्मचाऱ्यांना सरकारने अस्थायी ठेवले होते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर झाला होता. जलसंपदा विभागाने अस्थायी स्वरूपातील पदांना मान्यता देण्यासाठी मोठी दिरंगाई केली. एवढेच नव्हे तर उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांवर कार्यरत असणाऱ्यांनाही अभय दिले नाही. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. प्रशासकीय गतिमानता येण्यासाठी कर्मचाºयांना पाठबळ देणे गरजेचे होते.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीतगोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग १४, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग २ सावली तसेच उपविभाग ७, ८ व ९ मध्ये सुमारे ७० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नागभीड, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, तालुक्यातही, कर्मचाºयांच्या फौजफाटा आहे. यातील बहुतेक कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना मुदतवाढ दिल्याने सुखावले तर दुसरीकडे गोसीखुर्दचे पाणी मिळण्यासाठी थंडबस्त्यातील कामे पूर्ण होतील, ही आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.