शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पोटापाण्याची शेतजमीन दिली तरीही प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे हात रोजगाराविना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:31 IST

Chandrapur : हताश प्रकल्पग्रस्तांचा वेकोलि व्यवस्थापकीय संचालक कार्यालयावर मोर्चा

सतीश जमदाडे लोकमत न्यूज नेटवर्क आवाळपूर : कोळसा खाणींसाठी शेतजमिनी दिल्या; मात्र अजूनही हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे हात रोजगाराविना रिकामे आहेत. वडिलोपार्जित जमीन दिल्यानंतर एकीकडे भूमिहिन तर दुसरीकडे कुटुंबातील बेरोजगारांची भटकंती, असे दुर्दैवाचे दशावतार प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला आले. त्यामुळे हताश प्रकल्पग्रस्तांनी आता नागपुरातील वेकोलि व्यवस्थापकीय संचालक कार्यालयावर मोर्चा नेण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात ३० कोळसा खाणी आहेत. यामध्ये अनेक कामगार कुशल, अकुशल कामगार काम करतात. वेकोलिने काही खाणींचे काम नवनवीन कंपन्यांकडे सोपवले. या कंपन्यांनी कामगार भरतीचे निकष व्यवस्थापनाच्या सोयीचे ठेवल्याने दिवसेंदिवस कामगारांची संख्या घटत चालली. त्यातही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडले. कंत्राटी कामगारांना कंपनीचे कंत्राट संपले की भटकंती करावी लागते. 

सध्या आवारपूर, राजुरा, गडचांदूर, घुग्घुस परिसरात हेच वास्तव दिसून येत आहे. कार्यरत कामगारांना कमी करून परप्रांतीय व अन्य कामगारांना पुनश्च सामावून घेणे सुरू झाले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व कंत्राटी कामगारांचा कुणी वाली उरला नाही. रोजगाराविना हतबल झालेले प्रकल्पग्रस्त व कंत्राटी कामगार नागपुरात वेकोलि व्यवस्थापकीय संचालक कार्यालयावर आंदोलन करणार आहेत.

करारात हवी तरतूद कंत्राटी कंपन्यांत कामगार संघटना कंपनीपुरत्या मर्यादित राहिल्याने कामगारांना न्याय दिला जात नाही. त्यामुळे वेकोलि अंतर्गत कंत्राटी कामगारांनाही स्वतंत्र कामगार संघटना स्थापन करण्याची परवानगी द्यावी.

काय आहेत मागण्या ? 

  • वेकोलि चंद्रपूर, बल्लारपूर, कन्हान, उमरेड वणी उतर कोळसा खाणी मध्यवर्ती भागात येतात. खाणी चालवणाऱ्या कंपन्यांनी प्रकल्पग्रस्तांसह ८० टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा. गोवरी खाणीतील कंपनी स्थानिकांना डावलून इतरांना रोजगार देत असल्याने कारवाई करावी.
  • स्थलांतरित व स्थानिक कामगारांना २ त्यांच्या वेतनाची स्लीप द्यावी. कंपनीचे टेंडर संपताच नवीन कंपनी आली तरी जुन्या कामगारांना बदलवू नये. नियमानुसारच प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे निकाली काढावी. राजकीय हस्तक्षेप टाळावा.
  • पात्रता व अनुभव असलेल्या 3 कामगारांना डावलू नये. कंत्राटी कंपनी अंतर्गत सर्वांना एचपीसी दराने वेतन मिळावे. कामाचे तास नियमानुसार आठ तास बंधनकारक करावे.

"२० वर्षांपासून कोळसा खाणीत काम करत आहे. मात्र, दर पाच वर्षानी कंत्राट बदलत असल्याने कामाची खात्री नाही. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाही हाच त्रास सुरू आहे." - सूरज मोरपाका, कामगार

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर