शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

शैक्षणिक सत्राला महिना उलटल्यानंतरही चंद्रपुरातील आरटीईच्या ३९ हजार ६८२ जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:17 IST

Chandrapur : एक लाख एक हजार ९६७ जागांपैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच झाला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेशासाठीच्या राखीव २५ टक्के कोट्यासाठी सन २०२५-२०२६ या शैक्षणिक सत्रासाठी राज्यभरात एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र, त्यापैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच आतापर्यंत प्रवेश झाला आहे. 

परिणामी, शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही तब्बल ३९ हजार ६८२ जागा राज्यात शिल्लक असल्याचे वास्तव आहे. आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२५-२०२६ या सत्रासाठी आठ हजार ८६३ शाळांची नोंदणी झाली. यात एक लाख ९ हजार १०२ जागा रिक्त आहेत. त्यासाठी तीन लाख ५ हजार १५१ जणांनी अर्ज केले. त्यापैकी एक लाख १ हजार ९६७ जणांची प्रवेश फेरीतून निवड झाली. मात्र, आतापर्यंत केवळ ६९ हजार ४२० जणांचाच प्रवेश झाला आहे, तर ३९ हजार ६८२ जागा रिक्त राहणार आहेत. 

विदर्भातील प्रवेश झालेली स्थितीअमरावती १०६७, अकोला १४०१, यवतमाळ १२५३, बुलढाणा २०६७, वाशिम ६८५, नागपूर ४५७६, भंडारा ६०९, गोंदिया ७५१, चंद्रपूर १०७२, गडचिरोली ३०७, वर्धा २१६

प्रवेशाकडे का फिरवत आहेत पाठ ?जिल्ह्यात वा शहरात ज्या नामांकित शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवत नाही. अनेकांना आपल्या मर्जीतील शाळा मिळत नाही. त्यामुळे अनेक जण प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवत आहेत.

दरवर्षीच जागा राहतात रिक्तनामांकित शाळेतील शिक्षण महागडे झाले असल्याची पालकांची ओरड असली तरीही दरवर्षीच अनेक जणांची निवड झाली असतानाही प्रवेश घेत नाही. त्यामुळे २५ हजारांच्या आसपास जागा रिक्त राहत असल्याचे चित्र दरवर्षीच दिसून येते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा