शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ५० जलशुद्धीकरण संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्यात येतील. यासाठी सरकारचा कोणताही निधी न वापरता हा प्रयोग राबविणार आहोत. पाण्याचा योग्य वापर, त्याचे योग्य व्यवस्थापन हे कौशल्य मातृशक्तीला योग्य पध्दतीने अवगत असल्याने महिला बचतगटांना व्यवस्थापनाचा भार सोपविण्यात आला आहे. महिला बचतगटांनी ही जबाबदारी प्रभावीपणे राबवून राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात रविवारी आयोजित हस्तांतरण प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये भेल व महानिर्मीती कंपनीच्या सीएसआर निधीतून जलशुध्दीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) बसविण्यात आले आहेत. ही संयंत्रे देखभाल, दुरूस्ती व संचलन यासाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, रोशनी खान, वनीता आसुटकर, पंचायत समिती सदस्य केमा रायपूरे, रामपालसिंग, प्रमोद कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात ५० महिला बचतगटांपैकी काही महिला बचतगटांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या हस्ते हस्तांतरण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यातून दहावीमध्ये प्रथम आलेली साक्षी मारोती वराटकर, द्वितीय आलेली गौरी प्रविण भोयर, तृतीय अंजली राजेश विचुरकर, चौथी गुंजन यादवराव खराबे, पाचवी सेजल सुनील आयलनवार तर सहावी किशोरी दशरथ राजुरकर या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर प्रास्ताविक मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळणारमहिला बचत गटांना जलशुद्धीकरण संयंत्रांच्या देखभाल व दुरूस्तीच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाण्यासह थंड पाणी देण्यात येणार आहे. यादृष्टीने संयंत्राला चिलर बसविण्यात आल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.