शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचसूत्रीतून जिल्हा कृषी समृद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:28 IST

कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकºयांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. शेती हाच विकासाचा महामार्ग आहे. उन्नत शेतीसाठी सर्व प्रयत्न करा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.११ ते १५ जानेवारीपर्यंत येथील चांदा क्लब ग्राउंडवर जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनीही यावेळी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपाचे उपआयुक्त भालचंद्र बेहरे आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, शेती हा व्यवसाय फायद्याचा व्हावा, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.कृषी विद्यापीठांमध्ये एकात्मिक कृषी व्यवसाय या प्रकल्पामध्ये अडीच एकराच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी चार लाख रुपये कसे होईल, याचे प्रात्यक्षिक आपण स्वत: बघितले. त्यामुळे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. शेती, जोडधंदा, प्रशिक्षण अशा माध्यमातून एकात्मिक कृषी व्यवसाय शक्य आहे. जिल्ह्यामध्ये काही प्रयोग सुरू झाले आहेत. चंद्रपूरमध्ये धान उत्पादक पाच हजार शेतकºयांना प्रशिक्षित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विभागातील दहा दहा गावे दत्तक घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी जमिनीमध्ये कशा पद्धतीने भरघोस पीक घेता येतात, याचे प्रात्यक्षिक द्यावे. यासाठी लागणारा खर्च शासन उचलेल पण कृषी विद्यापीठे हे कृषी आर्थिक क्रांतीचे केंद्र झाली पाहिजेत. विद्यापीठाचे प्रयोग प्रत्यक्षात उतरले पाहिजे.यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन व मत्स्य विद्यापीठाने चंद्रपूर जिल्हा दत्तक घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शेती विकासासंदर्भातल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी उपस्थित शेतकºयांंना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी तर संचालन हेमंत शेंडे व एकता बंडावार यांनी केले.कृषी विद्यापीठांनी सॉईल हेल्थ कार्डसह पिकांबाबतही मार्गदर्शन करावेजिल्ह्यामध्ये जे.के. ट्रस्टच्या मदतीने दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरीचे जाळे विणले जात आहे. स्वीट क्रांतीला मधुमक्षिका पालनातून जिल्ह्यात सुरुवात झाली. एक हजार आदिवासी महिलांच्या निर्मितीच्या कंपनीलादेखील चालना दिली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी विद्यापिठांनी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ सॉईल हेल्थ कार्ड देऊन गप्प बसू नये. शेतकºयांना त्यांच्या जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.१५ दिवसात नुकसानभरपाईवन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला द्यावा हा कायदा लवकरच सरकार करत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या कायद्यान्वये १५ दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळेल,अन्यथा वनाधिकाºयांना दंड ठोठावला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.जिल्ह्यात क्लस्टर निर्मितीला वावया कृषी प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाची चर्चा, चिंतन व मनन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टर निर्मितीची संधी आहे. चिमूरमध्ये हळदीचे तर कोठारी व जिवती या परिसरात भाजीपाल्याचे क्लस्टर उभे राहू शकते. यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणत्या भागात कुठल्या पिकाचे क्लस्टर उभारायचे, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विद्यापीठाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या.