शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

पंचसूत्रीतून जिल्हा कृषी समृद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:28 IST

कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकºयांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद्याची उपलब्धता व योग्य प्रशिक्षण या पंचसूत्रींचा अवलंब करून जिल्हा कृषी समृद्ध करण्यासाठी सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. शेती हाच विकासाचा महामार्ग आहे. उन्नत शेतीसाठी सर्व प्रयत्न करा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.११ ते १५ जानेवारीपर्यंत येथील चांदा क्लब ग्राउंडवर जिल्हा कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनीही यावेळी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपाचे उपआयुक्त भालचंद्र बेहरे आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, शेती हा व्यवसाय फायद्याचा व्हावा, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.कृषी विद्यापीठांमध्ये एकात्मिक कृषी व्यवसाय या प्रकल्पामध्ये अडीच एकराच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी चार लाख रुपये कसे होईल, याचे प्रात्यक्षिक आपण स्वत: बघितले. त्यामुळे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. शेती, जोडधंदा, प्रशिक्षण अशा माध्यमातून एकात्मिक कृषी व्यवसाय शक्य आहे. जिल्ह्यामध्ये काही प्रयोग सुरू झाले आहेत. चंद्रपूरमध्ये धान उत्पादक पाच हजार शेतकºयांना प्रशिक्षित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी विद्यापीठांनी प्रत्येक विभागातील दहा दहा गावे दत्तक घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी जमिनीमध्ये कशा पद्धतीने भरघोस पीक घेता येतात, याचे प्रात्यक्षिक द्यावे. यासाठी लागणारा खर्च शासन उचलेल पण कृषी विद्यापीठे हे कृषी आर्थिक क्रांतीचे केंद्र झाली पाहिजेत. विद्यापीठाचे प्रयोग प्रत्यक्षात उतरले पाहिजे.यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन व मत्स्य विद्यापीठाने चंद्रपूर जिल्हा दत्तक घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शेती विकासासंदर्भातल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी उपस्थित शेतकºयांंना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी तर संचालन हेमंत शेंडे व एकता बंडावार यांनी केले.कृषी विद्यापीठांनी सॉईल हेल्थ कार्डसह पिकांबाबतही मार्गदर्शन करावेजिल्ह्यामध्ये जे.के. ट्रस्टच्या मदतीने दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरीचे जाळे विणले जात आहे. स्वीट क्रांतीला मधुमक्षिका पालनातून जिल्ह्यात सुरुवात झाली. एक हजार आदिवासी महिलांच्या निर्मितीच्या कंपनीलादेखील चालना दिली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी विद्यापिठांनी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ सॉईल हेल्थ कार्ड देऊन गप्प बसू नये. शेतकºयांना त्यांच्या जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.१५ दिवसात नुकसानभरपाईवन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला द्यावा हा कायदा लवकरच सरकार करत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या कायद्यान्वये १५ दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळेल,अन्यथा वनाधिकाºयांना दंड ठोठावला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.जिल्ह्यात क्लस्टर निर्मितीला वावया कृषी प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाची चर्चा, चिंतन व मनन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टर निर्मितीची संधी आहे. चिमूरमध्ये हळदीचे तर कोठारी व जिवती या परिसरात भाजीपाल्याचे क्लस्टर उभे राहू शकते. यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणत्या भागात कुठल्या पिकाचे क्लस्टर उभारायचे, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विद्यापीठाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या.