शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य लाभल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशभक्तीची भावना ही क्षणिक न ठेवता वर्षभर ही भावना मनात कायम ठेवत भारताच्या विकासाचा विचार पुढे नेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. लालबहादुर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, अटलजींनी त्याला जय विज्ञान अशी जोड दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय अनुसंधान अशी जोड त्याला दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्यपरायणतासुध्दा शिकविते. ज्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला लाभले, सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वाड्रन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेफ्टनंट जनरल अनमोल, चंद्रपूर मनपाचे सदस्य संजय कंचर्लावार, रवी आसवानी, प्रविण पडवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिरंगा ध्वजाला व वीर जवानांना आदरांजली दिली. गणराज्य दिन चिरायु होवो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे व परेडचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, जेव्हा विद्यार्थी परेडदरम्यान सोबत पुढे जात होते तेव्हा ऐक्याची भावना प्रदर्शित झाली.कोणीही एकटा नव्हता. हे ऐक्य भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. जगातल्या काही देशांना भारताची प्रगती आवडत नाही, ते भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. मात्र भारताने वेळोवेळी त्यांना चौख उत्तर दिले आहे. ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे गीत विद्यार्थ्याने गायले. देशाचे रक्षण करण्यासाठी तळहातावर प्राण घेवून सीमेवर सैनिक तैनात आहे. या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश रक्षणासाठी ‘दिल दिया है पढाई में ध्यान भी देंगे’ अशी भावना ठेवत आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :Socialसामाजिक