शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

राखीव जमिनीवर श्रीमंतांचे अतिक्रमण

By admin | Updated: July 27, 2014 23:40 IST

स्मशानभूमी, गुरेचराईसाठी राखीव असलेल्या जागेवरच गावातील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच जागेवर गेल्या काही वर्षापासून पीक घेऊन उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरु आहे.

चंद्रपूर : स्मशानभूमी, गुरेचराईसाठी राखीव असलेल्या जागेवरच गावातील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच जागेवर गेल्या काही वर्षापासून पीक घेऊन उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरु आहे. अतिक्रमीत जागा मोकळी करण्यात न आल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.काही दिवसांपूर्वीच एसडीओंनी ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय घेऊन ही जागा खाली करण्याचे निर्देश अतिक्रमणधारकांना दिले होते. मात्र, एसडीओंच्या आदेशावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे राखीव जागेवरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास धनाढ्यांच्या शेतातच जनावरे शिरवून त्यांच्या पिकांचे नुकसान करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.धनाढ्य अतिक्रमणधारकांचा मनमानी कारभार सिंदोळा येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आणला. सावली तालुक्यातील सिंदोडा येथे एक हजार लोकसंख्येचे गाव. याच गावात जवळपास साडेसतरा एकर जागा स्मशानभूमी आणि गुरेचराईसाठी राखीव आहे. याच जागेवर प्रारंभी ग्रामस्थ आपले जनावरे चराईसाठी नेत होते. येथे स्मशानभूमीचे कामही प्रस्तावित होते. मात्र, याच राखीव जागेवर गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपला कब्जा केला. एवढ्यावरच ते थांबले नाही. त्यांनी या जागेवर शेती करणेही सुरु केले. शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता धनाढ्या बारमाही पिक याच अतिक्रमीत जागेवर घेत आहेत. राखीव जागेवरच अतिक्रमण करण्यात आल्याने गावकऱ्यांना गुरेचराईसोबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार- पाच वर्षापासून हे अतिक्रमण हटविण्यात यावे,अशी मागणी करीत ग्रामस्थ लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच मूल येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला. अतिक्रमणधारकांनी तातडीने राखीव जागा मोकळी करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले. या आदेशाने अतिक्रमण निघेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगनादेश काढला. स्थगनादेशाने अतिक्रमणधारकांचे मनोधैर्य वाढले आहे. याप्रकरणाची कोणतीही चौकशी न करता स्थगनादेश मिळाल्याने गावकऱ्यांतही संतापाचे वातावरण पसरले आहे. येत्या २८ जुलैपर्यंत अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणधारकांच्या शेतातच जनावरे सोडण्याच्या मानसिकतेत असल्याचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा उंदिरवाडे, सुरेश मॅकलवार यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण हटविण्याबाबत नागरिकांचे प्रयत्न सातत्याने सुरु आहे. मात्र, कोणाचेही त्यांना सहकार्य मिळत नाही. (शहर प्रतिनिधी)