शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
4
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
5
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
6
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
7
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
8
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
9
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
11
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
12
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
13
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
14
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
15
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
16
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
17
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
19
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...

४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:40 IST

घुग्घुसमध्ये संतापाची लाट : १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस देण्यासाठी महसूलच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शहरातील महसूल भूखंडावर मागील ४० वर्षापासून घरे बांधून निवास करणाया दीडशे कुटुंबांना महसूल विभागाने अतिक्रमण हटावची नोटीस बजावली. अडीच महिन्यांपूर्वी असा प्रयत्न झाल्यानंतर नागरिकांकडून विरोध झाल्याने प्रशासनाने माघार घेतली होती. मात्र, पुन्हा कारवाईसाठी सरसावल्याने घुग्घुसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. 

घुग्घुस शहर औद्योगिक म्हणून ओळखले जाते. रोजगाराच्या निमित्ताने ४० वर्षांपासून शेकडो कुटुंबांनी त्यावेळी महसूल विभागाच्या अमरा भूखंडावर अमराही वॉर्डातील सर्व्हे क्र. २६४ आराजीपैकी ४६२ चौ. मी. जमिनीवर घरे बांधली. या घरांमुळे खरे तर घुग्घुसला शहराचे स्वरूप आले. ग्रामपंचायतीपासून आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायतीच्या निर्मितीपासूनच येथील संबंधित कुटुंबांनी जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकार व जिल्हास्तरीय महसूल प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले नाही. कायमस्वरूपी पट्टे देण्याचा प्रस्ताव, नागरिकांची निवेदने प्रशासनाकडे खितपत पडली आहेत. 

अडीच महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत नायब तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावणे सुरू केले. त्यावेळी नागरिकांकडून प्रचंड विरोध झाला होता. हा संताप पाहून कारवाई थांबविण्यात आली होती. ती पुन्हा सुरू झाली.

पुनर्वसनाचे आश्वासन हवेत विरलेमहसुली भूखंडावरील अमराही वॉर्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी भूस्खलनाची घटना घडली होती. तेव्हा एक इमारत जमिनीत गडप झाली. तेव्हा शासनाने येथील कुटुंबांचे पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले. मात्र, अडीच वर्षे होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही. काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. नोटीसा बजावल्याने घुग्घुस शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजकीय श्रेय घेतले; पण मूळ प्रश्न कायमशासनाने पुनर्वसनासाठी भूखंडाच्या निश्चितीनंतर मोजणीही झाली होती. याबाबत राजकीय पक्षांनीही श्रेय घेतले होते. मात्र, मूळ प्रश्न काही सुटला नाही. या भूखंडावर विविध भागांत एक हजार ३०० पेक्षा अधिक नागरिक गेल्या ४० वर्षापासून कुटुंबांसोबत राहत आहेत. त्यांना नायब तहसीलदार चंद्रपूर यांनी अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे. स्वतःहून अतिक्रमण हटविले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

"घुग्घुस परिसर व अन्य गावांतील एक हजार ३०० कुटुंबांचे महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण आहे. अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा बजावल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, संख्या अधिक असल्याने वेळ लागत आहे. सुनावणीनंतर वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसारच पुढील कार्यवाही करू."- डॉ. सचिन खंडाळे, नायब तहसीलदार चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर