शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:40 IST

घुग्घुसमध्ये संतापाची लाट : १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस देण्यासाठी महसूलच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शहरातील महसूल भूखंडावर मागील ४० वर्षापासून घरे बांधून निवास करणाया दीडशे कुटुंबांना महसूल विभागाने अतिक्रमण हटावची नोटीस बजावली. अडीच महिन्यांपूर्वी असा प्रयत्न झाल्यानंतर नागरिकांकडून विरोध झाल्याने प्रशासनाने माघार घेतली होती. मात्र, पुन्हा कारवाईसाठी सरसावल्याने घुग्घुसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. 

घुग्घुस शहर औद्योगिक म्हणून ओळखले जाते. रोजगाराच्या निमित्ताने ४० वर्षांपासून शेकडो कुटुंबांनी त्यावेळी महसूल विभागाच्या अमरा भूखंडावर अमराही वॉर्डातील सर्व्हे क्र. २६४ आराजीपैकी ४६२ चौ. मी. जमिनीवर घरे बांधली. या घरांमुळे खरे तर घुग्घुसला शहराचे स्वरूप आले. ग्रामपंचायतीपासून आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायतीच्या निर्मितीपासूनच येथील संबंधित कुटुंबांनी जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकार व जिल्हास्तरीय महसूल प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले नाही. कायमस्वरूपी पट्टे देण्याचा प्रस्ताव, नागरिकांची निवेदने प्रशासनाकडे खितपत पडली आहेत. 

अडीच महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत नायब तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावणे सुरू केले. त्यावेळी नागरिकांकडून प्रचंड विरोध झाला होता. हा संताप पाहून कारवाई थांबविण्यात आली होती. ती पुन्हा सुरू झाली.

पुनर्वसनाचे आश्वासन हवेत विरलेमहसुली भूखंडावरील अमराही वॉर्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी भूस्खलनाची घटना घडली होती. तेव्हा एक इमारत जमिनीत गडप झाली. तेव्हा शासनाने येथील कुटुंबांचे पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले. मात्र, अडीच वर्षे होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही. काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. नोटीसा बजावल्याने घुग्घुस शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजकीय श्रेय घेतले; पण मूळ प्रश्न कायमशासनाने पुनर्वसनासाठी भूखंडाच्या निश्चितीनंतर मोजणीही झाली होती. याबाबत राजकीय पक्षांनीही श्रेय घेतले होते. मात्र, मूळ प्रश्न काही सुटला नाही. या भूखंडावर विविध भागांत एक हजार ३०० पेक्षा अधिक नागरिक गेल्या ४० वर्षापासून कुटुंबांसोबत राहत आहेत. त्यांना नायब तहसीलदार चंद्रपूर यांनी अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे. स्वतःहून अतिक्रमण हटविले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

"घुग्घुस परिसर व अन्य गावांतील एक हजार ३०० कुटुंबांचे महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण आहे. अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा बजावल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, संख्या अधिक असल्याने वेळ लागत आहे. सुनावणीनंतर वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसारच पुढील कार्यवाही करू."- डॉ. सचिन खंडाळे, नायब तहसीलदार चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर