शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे कर्मचार्‍यांचे नियोजन बिघडले

By admin | Updated: May 27, 2014 23:36 IST

मे-जून महिना शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा समजला जातो. बहुतांश कर्मचार्‍यांच्या बदल्या याच महिन्यात होते. यावर्षीही त्या होणार होत्या. मात्र प्रथम लोकसभा आणि त्यानंतर आता शिक्षक

चंद्रपूर : मे-जून महिना शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा समजला जातो. बहुतांश कर्मचार्‍यांच्या बदल्या याच महिन्यात होते. यावर्षीही त्या होणार होत्या. मात्र प्रथम लोकसभा आणि त्यानंतर आता शिक्षक आमदाराच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्याने बदलीसत्र सध्या स्थगित झाले आहे. त्यामुळे बदलीपात्र काही कर्मचार्‍यांनी केलेले तडजोडीचे नियोजन आता बिघडले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जिल्हा परिषद, तसेच अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचा बदल्यांचे सत्र सुरु झाले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या तसेच अन्य कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रतही ठरवून दिले होते. प्रथम समुपदेशनाद्वारे बदल्यांसाठी कर्मचार्‍यांना बोलाविण्यात आले होते. या बदल्यांमुळे अनेकांचा मनस्ताप वाढला असतानाही काही कर्मचार्‍यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला. मागील काही वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या पसंतीच्या गावात बदलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र काही कर्मचारी वगळता नक्षलग्रस्त भागातून इतरत्र जाण्याच्या कर्मचारी मनस्थितीत नाही.

आपसी बदली, विनंती बदली करणार्‍या कर्मचार्‍यांनी अनेक तडजोडी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तडजोडी सध्या हवेत गेल्या आहे. अनेकांनी मागील सहा महिन्यांपासून बदलीसाठी ‘फिल्डींग’ लावून ठेवली होती. काहींनी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी तर काही जिल्हा बदलीसाठीही आपले अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दिले होते. मात्र आचारसंहितेमुळे बदल्यांवर स्थगिती आल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक तसेच अन्य कर्मचारी शहरात राहून ग्रामीण भागात आपली सेवा बजावतात. त्यामुळे ते रस्त्यावरील आणि वाहन जाणार्‍या गावांना पसंती देतात. यासाठी बदली होण्याच्या काही महिन्यांपासून तडजोडीच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचार्‍यांना आचारसंहितेमुळे चांगलाच धक्का बसला. (नगर प्रतिनिधी)