शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बीपीएल, गावकरी एपीएल

By admin | Updated: May 1, 2015 01:15 IST

गोंडपिपरी तालुक्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील कन्हाळगाव जंगलव्याप्त परिसरात आहे.

आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील कन्हाळगाव जंगलव्याप्त परिसरात आहे. गावात आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात असून गावकऱ्यांचा व्यवसाय शेती आहे. उन्हाचे चटके, पावसाच्या झळा सोसत जंगलात वास्तव्य करणारे गावकरी एपीएल यादीत आहेत. तर सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत चार भिंतीच्या आड निवांतपणे शासकीय कर्तव्य बजावणारे कर्मचारी मात्र बीपीएल यादीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.देशातील गरिबी निर्मूलनासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊले उचलले जात आहे. आर्थिक विषमता दूर व्हावी यासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे. दर दहा वर्षानंतर सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील गरीब व सधन कुटुंबाचे वर्गीकरण केले जाते. या सर्वेक्षणात जातीपातीच्या पलीकडे जावून कुटुंबाची सर्वकश माहिती गोळा केली जाते. दहा वर्षापुर्वी गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम व मागासलेल्या कन्हाळगावचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. पुढे याच सर्वेक्षणाच्या आधारे या गावातील दारिद्रय रेषेखालील कुटुंब व सधन कुटुंबाची निवड शासकीय नियमानुसार करण्यात आली. कन्हाळगाव हे जंगलाच्या कुशीत वसलेले गाव असून या गावात अज्ञान वर्ग राहतो. येथे सुशिक्षीत वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना शासनाच्या विकासाचे धोरण व त्याच्या प्रक्रियेची पुरेपूर जाण असल्याने ही मंडळी आज १० वर्षानंतरही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. जेव्हा की, कन्हाळगावातील सुशिक्षित वर्ग हा तेथील कर्मचारी असून अज्ञान व असमजदार स्थानिक गावकरी आहे. मात्र हेच गावकरी आज गावातील सधन कुटुंबाच्या यादीत मोडत आहेत. येथील गठेलठ्ठ पगाराचे कर्मचाऱ्यांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश असल्याने ते बीपीएल क्रमांकाच्या आधारे शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र गरीब या योजनापासून कोसो दूर आहे. कन्हाळगावातील आदिवासीचे जीवनचक्र अजूनही चंद्रभोळ्या झोपडीत चालू आहे. हातावर आणून पाणावर खाण्यापर्यंतची त्याची आर्थिक स्थिती नाजूक असून केवळ बीपीएल यादीत आदिवासीच्या नावाचा समावेश नसल्याने ते आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक विकासाला मुकले आहेत. त्याची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना सुद्धा आर्थिक स्तर उंचावण्याचा कुठलाच मंत्र त्यांच्याकडे नाही. आर्थिक सर्वेक्षणाच्या वेळेला दहा वर्षापूर्वी सर्वेक्षक कधीच गावात पोहचलेला नसल्याची तक्रार गावकऱ्यानी केली आहे. गावातील आर्थिक स्थितीची तपासणी सर्वेक्षकांनी केली नसून केवळ कागदी घोडे नाचवून सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर केल्याचा आरोप सरपंच मंगला मडावी व उपसरपंच प्रदीप कुळमेथे यांनी केला आहे. अशातच आता दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण केवळ सरकारच्या भुलथापा ठरल्या आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शासनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. (वार्ताहर)