शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:42 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावले आहेत. मात्र या वजन काट्यावर नियमबाह्यरीत्या काम होत आहे.

ठळक मुद्देमनपाची आमसभा : कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावले आहेत. मात्र या वजन काट्यावर नियमबाह्यरीत्या काम होत आहे. या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. अखेर याबाबत तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन महापौरांना द्यावे लागले.महानगरपालिकेचे आमसभा आज गुरुवारी दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजली घोटेकर होत्या. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते.सभेला सुरुवात होताच नगरसेवक पप्पु देशमुख यांनी मनपाच्या या इलेक्ट्रानिक वजनकाट्यांचा विषय सभागृहापुढे ठेवला. चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर मनपाने इलेक्ट्रानिक वजन काटे लावले आहेत. मनपा हद्दीत येणाºया जडवाहनावर कारवाई करणे, हा यामागील उद्देश. मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. या वजनकाट्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागातील वाहतूक निरीक्षक यांच्या बसण्याची व्यवस्था असावी, असे शासनाच्या अध्यादेशात नमूद आहे. तशी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे वाहतूक निरीक्षक नसतो. मागील दीड वर्षांपासून या वजन काट्यावर एकाही जडवाहनावर कारवाई झालेली नाही. सर्व ओव्हरलोड वाहनांना मनपा हद्दीत जाण्याची सरसकट परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न नगरसेवक पप्पु देशमुख यांनी उपस्थित केला. सभागृहात उपस्थित आणखी अनेक नगरसेवकांनी देशमुख यांच्या मुद्याला पाठिंबा देत गदारोळ केला.यावर उत्तर देताना मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सदर वजन काटे शासनाच्या आदेशानुसार लावले असून ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची जबाबदारी परिवहन विभागाची असल्याचे सांगितले. परिवहन विभागाचा अधिकारी कारवाई करीत नसेल तर हे वजनकाटे तत्काळ बंद करा, अशी मागणी देशमुख यांनी केली. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी याबाबतची तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.असे झाले नुकसानया वजनकाट्यावर आतापर्यंत वजन मोजण्याच्या शुल्कापोटी तीन कोटी ६० लाख रुपयांच्यावर वसुली करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाचे सरासरी शुल्क ४० रुपये आहे. याचा अर्थ ११ ते १२ लाख वाहने मागील दीड वर्षात येथून गेली आहे, असे नगरसेवक पप्पु देशमुख यांनी सांगितले. यापैकी पाच टक्के वाहनातून ओव्हरलोड वाहतूक झाली, असे समजल्यास ६० हजारच्या वर ओव्हरलोड वाहने येथून गेली. यातून प्रत्येकी किमान पाच हजार रुपये दंड पकडल्यास २५ ते ३० कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडाला आहे, असे देशमुख यांनी सभागृहासमोर स्पष्ट करून सांगितले.जादा कर रद्द करासध्या मनपा हद्दीतील मालमत्ता करात दोन टक्के जादा कर आकारला जात आहे. शासनाच्या आदेशामुळे असे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आधीच वाढीव कर आकारला जात आहे. आता पुन्हा दोन टक्के जादा कर नागरिकांवर अधिकचा भुर्दंड टाकणारा आहे. त्यामुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी नगरसेविका सुनिता लोढिया यांनी केली. दरम्यान, महानगरपालिकेची अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिकेची अवस्था फारशी चांगली नाही. या वाहनांच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी सभागृहात सांगितले.