शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

१११ कोटींची विजेची कामे

By admin | Updated: June 3, 2017 00:30 IST

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

हंसराज अहीर : पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत. त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून एकूण १० नवीन उपकेंद्रे उभी राहणार आहेत. तसेच ४६२ नवीन रोहित्र लावण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ग्रामीण भागातील फीडर सेपरेशन, वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील उपकेंद्र, रोहित्र दुरुस्ती, मीटर अद्यावतीकरण आदी कामांचा अंतर्भाव आहे. शिवाय अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे. जिल्हयात सुरु असलेल्या कामांचा आज आढावा घेण्यात आला. अधीक्षक अभियंता हरीश गजभे यांनी योजनेच्या वाटचाली संदर्भात माहिती दिली. बैठकीला आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, संतोष तंगरपल्लीवार व गोदावरी केंद्रे तसेच जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सुशील बोंडे आदी उपस्थित होते. एकात्मिक ऊर्जा विकास योजनादेखील केंद्र शासनाची शहरी भागातील वीज विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सुरु करण्यात आलेली योजना असून त्यामधून चंद्रपूर, मूल, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजूरा व ब्रह्मपुरी या शहरांचा समावेश आहे. या योजनेतून भूमिगत केबल टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करायची आहे. पावसाळ्यासाठी आपातकालीन योजना कराकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी योजनेची आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा विद्युत समितीची बैठक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ना. अहीर म्हणाले की, महाराष्ट्राला विजेचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर लोकप्रतिनिधींची काळजी योग्य ठरते. महावितरणने आपल्या उपलब्ध मनुष्यबळातून नियोजन करुन पावसाळयासाठी आपातकालीन योजना तायर करून तिच्या अंमलबजावणीची आठवड्याभरात व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.