शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

१११ कोटींची विजेची कामे

By admin | Updated: June 3, 2017 00:30 IST

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

हंसराज अहीर : पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत. त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून एकूण १० नवीन उपकेंद्रे उभी राहणार आहेत. तसेच ४६२ नवीन रोहित्र लावण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ग्रामीण भागातील फीडर सेपरेशन, वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील उपकेंद्र, रोहित्र दुरुस्ती, मीटर अद्यावतीकरण आदी कामांचा अंतर्भाव आहे. शिवाय अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे. जिल्हयात सुरु असलेल्या कामांचा आज आढावा घेण्यात आला. अधीक्षक अभियंता हरीश गजभे यांनी योजनेच्या वाटचाली संदर्भात माहिती दिली. बैठकीला आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, संतोष तंगरपल्लीवार व गोदावरी केंद्रे तसेच जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सुशील बोंडे आदी उपस्थित होते. एकात्मिक ऊर्जा विकास योजनादेखील केंद्र शासनाची शहरी भागातील वीज विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सुरु करण्यात आलेली योजना असून त्यामधून चंद्रपूर, मूल, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजूरा व ब्रह्मपुरी या शहरांचा समावेश आहे. या योजनेतून भूमिगत केबल टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करायची आहे. पावसाळ्यासाठी आपातकालीन योजना कराकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी योजनेची आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा विद्युत समितीची बैठक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ना. अहीर म्हणाले की, महाराष्ट्राला विजेचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर लोकप्रतिनिधींची काळजी योग्य ठरते. महावितरणने आपल्या उपलब्ध मनुष्यबळातून नियोजन करुन पावसाळयासाठी आपातकालीन योजना तायर करून तिच्या अंमलबजावणीची आठवड्याभरात व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.