शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

१११ कोटींची विजेची कामे

By admin | Updated: June 3, 2017 00:30 IST

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

हंसराज अहीर : पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत. त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून एकूण १० नवीन उपकेंद्रे उभी राहणार आहेत. तसेच ४६२ नवीन रोहित्र लावण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ग्रामीण भागातील फीडर सेपरेशन, वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील उपकेंद्र, रोहित्र दुरुस्ती, मीटर अद्यावतीकरण आदी कामांचा अंतर्भाव आहे. शिवाय अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे. जिल्हयात सुरु असलेल्या कामांचा आज आढावा घेण्यात आला. अधीक्षक अभियंता हरीश गजभे यांनी योजनेच्या वाटचाली संदर्भात माहिती दिली. बैठकीला आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, संतोष तंगरपल्लीवार व गोदावरी केंद्रे तसेच जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सुशील बोंडे आदी उपस्थित होते. एकात्मिक ऊर्जा विकास योजनादेखील केंद्र शासनाची शहरी भागातील वीज विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सुरु करण्यात आलेली योजना असून त्यामधून चंद्रपूर, मूल, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजूरा व ब्रह्मपुरी या शहरांचा समावेश आहे. या योजनेतून भूमिगत केबल टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करायची आहे. पावसाळ्यासाठी आपातकालीन योजना कराकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी योजनेची आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा विद्युत समितीची बैठक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ना. अहीर म्हणाले की, महाराष्ट्राला विजेचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर लोकप्रतिनिधींची काळजी योग्य ठरते. महावितरणने आपल्या उपलब्ध मनुष्यबळातून नियोजन करुन पावसाळयासाठी आपातकालीन योजना तायर करून तिच्या अंमलबजावणीची आठवड्याभरात व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.