शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ऐच्छिक विषय समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:38 IST

वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिले निवेदन: आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते. मात्र चिमूर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य पारंगत या पदवीकरिता चवथ्या सत्रात विद्यार्थांना स्वेच्छेने ऐच्छिक विशेषीकरण विषय निवडण्याचा हक्क असताना सुद्धा प्राचार्याने ऐच्छिक विशेषीकरण विषयासाठी विद्यार्थ्यांना नाकारले आहे.चिमूर तालुक्यात असलेले एकमेव आठवले समाजकार्य महाविद्यालय गोंडवाना विद्यापिठांतर्गत कार्यरत आहे. या महाविद्यालयातुन समाजकार्य दृष्टीकोनातुन विविध विषयांचे पदवी व पदवित्तर शिक्षण दिल्या जाते. पदवी व पदवित्तर अभासक्रमात अखेरच्या वर्षाला क्षेत्र कार्य व संशोधनाकरिता सामूदायिक विकास, श्रम कल्याण तथा वैद्यकिय मानसशास्त्र हे विशेषीकरण विषय विद्यार्थ्यांना ऐच्छिक आहेत. या वर्षाच्या चालु सत्रातील अंतीमसत्राला एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी सामुदायिक विकास हे विषय मिळण्याकरिता महाविद्यालयात अर्ज केला. यापैकी केवळ २४ विद्यार्थ्यांना सामुदायिक विकास या विषयाकरिता मंजुरी देण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने श्रम कल्याण व वैद्यकीय मानसशास्त्र विशेषीकरण विषयात टाकण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी सामुदायिक विकास विशेषीकरण विषयापासुन वंचित आहे. या विषयी विद्यार्थ्यांनी प्राचार्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी विद्यार्थांना दुसरा पर्याय निवडावा, अन्यथा महाविद्यालयात उपलब्ध विशेषीकरण विषय प्राविण्याप्र्रमाणे देण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली. ऐच्छिक विशेषीकरण विषयापासुन वंचित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सामुदायिक विकास या विशेषीकरणाकरिता मान्यता देण्याची विनंती केली. मात्र प्राचार्यांनी ती फेटाळून लावली. उर्वरित विद्यार्थ्यांनी वैद्यकिय व श्रम कल्याण हे दोन विशेषीकरण विषय घ्या, अन्यथा टिसी घेऊन जाण्याची धमकी दिल्यामूळे विद्यार्थी धास्तावले आहे. विद्यार्थ्याचा हक्क हिरावून घेतल्याचा प्रकार या महाविद्यालयातुन होत आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भिती विद्यार्थ्यांना आहे.या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू भुसारी यांच्याकडे दाद मागण्याकिरात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. मात्र दखल घेण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय