शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

ऐच्छिक विषय समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:38 IST

वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिले निवेदन: आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते. मात्र चिमूर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य पारंगत या पदवीकरिता चवथ्या सत्रात विद्यार्थांना स्वेच्छेने ऐच्छिक विशेषीकरण विषय निवडण्याचा हक्क असताना सुद्धा प्राचार्याने ऐच्छिक विशेषीकरण विषयासाठी विद्यार्थ्यांना नाकारले आहे.चिमूर तालुक्यात असलेले एकमेव आठवले समाजकार्य महाविद्यालय गोंडवाना विद्यापिठांतर्गत कार्यरत आहे. या महाविद्यालयातुन समाजकार्य दृष्टीकोनातुन विविध विषयांचे पदवी व पदवित्तर शिक्षण दिल्या जाते. पदवी व पदवित्तर अभासक्रमात अखेरच्या वर्षाला क्षेत्र कार्य व संशोधनाकरिता सामूदायिक विकास, श्रम कल्याण तथा वैद्यकिय मानसशास्त्र हे विशेषीकरण विषय विद्यार्थ्यांना ऐच्छिक आहेत. या वर्षाच्या चालु सत्रातील अंतीमसत्राला एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी सामुदायिक विकास हे विषय मिळण्याकरिता महाविद्यालयात अर्ज केला. यापैकी केवळ २४ विद्यार्थ्यांना सामुदायिक विकास या विषयाकरिता मंजुरी देण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने श्रम कल्याण व वैद्यकीय मानसशास्त्र विशेषीकरण विषयात टाकण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी सामुदायिक विकास विशेषीकरण विषयापासुन वंचित आहे. या विषयी विद्यार्थ्यांनी प्राचार्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी विद्यार्थांना दुसरा पर्याय निवडावा, अन्यथा महाविद्यालयात उपलब्ध विशेषीकरण विषय प्राविण्याप्र्रमाणे देण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली. ऐच्छिक विशेषीकरण विषयापासुन वंचित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सामुदायिक विकास या विशेषीकरणाकरिता मान्यता देण्याची विनंती केली. मात्र प्राचार्यांनी ती फेटाळून लावली. उर्वरित विद्यार्थ्यांनी वैद्यकिय व श्रम कल्याण हे दोन विशेषीकरण विषय घ्या, अन्यथा टिसी घेऊन जाण्याची धमकी दिल्यामूळे विद्यार्थी धास्तावले आहे. विद्यार्थ्याचा हक्क हिरावून घेतल्याचा प्रकार या महाविद्यालयातुन होत आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भिती विद्यार्थ्यांना आहे.या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू भुसारी यांच्याकडे दाद मागण्याकिरात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. मात्र दखल घेण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय