शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

परिवर्तनशील विचारांचे साहित्यकार होते एकनाथ साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

वसंत खेडेकर बल्लारपूर : काही व्यक्तींमध्ये सदासर्वदा दांडगा उत्साह, कामात तरबेजपणा, उत्सवप्रियता वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम असते. चंद्रपूरचे माजी ...

वसंत खेडेकर

बल्लारपूर : काही व्यक्तींमध्ये सदासर्वदा दांडगा उत्साह, कामात तरबेजपणा, उत्सवप्रियता वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम असते. चंद्रपूरचे माजी आमदार, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी ॲड. एकनाथ साळवे हे त्यातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व!

एकनाथरावांचे जन्मगाव बल्लारपूरजवळील बामणी हे खेडे! कास्तकार कुटुंबात जन्मलेल्या एकनाथरावांना शिक्षणासोबतच वाचनाची व लिखाणाची आवड ! विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्याकडे, परिवर्तन चळवळीकडे वळले. विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एकनाथ साळवे यांनी पुरोगामी विचारांच्या चळवळी उभ्या केल्या. म. गांधीजी आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी ते जुळले. सेवादलाचे कार्यकर्ते झाले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे १९६७ व १९७२ असे ते दोनदा आमदार राहिले. काँग्रेस १९७८ ला दुभंगली. काँग्रेसचे इंडिकेट व सिंडिकेट असे दोन गट पडल्यानंतर ते सिंडिकेटकडून उभे राहिले; पण त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर राजकारणाला रामराम ठोकून त्यांनी सामाजिक परिवर्तन चळवळीकडे आपला मोर्चा वळविला. सोबतच त्यांनी लेखन केले. 'एन्काउंटर' ही आदिवासी जीवन संघर्षावर कादंबरी लिहिली. 'मी बुद्ध धम्म स्वीकारला' हे पुरोगामी विचारांचे पुस्तक लिहिले. इतरही काही पुरोगामी विचारांवर त्यांनी पुस्तके लिहिली. साहित्यासोबतच कलाक्षेत्रात उमदे रसिक म्हणून त्यांचा कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय वावर असायचा. हातात पेन, कागद ठेवून ते भाषणांचे रंग कलांचे मुद्दे टिपत! मग ते साहित्य संमेलन असू दे की, नृत्य वा गायन कार्यक्रम! त्यांची रसिकता वाखाणण्याजोगी होती. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले आहे. क्रांतिसूर्य ज्योतिबांच्या विचारांना ते अग्रभागी मानत, म्हणूनच त्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयांना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे दिलीत.

बॉक्स

एसटीनेच प्रवास

एकनाथ साळवे हे दोनदा आमदार झाले होते; पण ते नेहमीच एसटी बसनेच प्रवास करीत. दोनदा आमदार राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःची कार असणे अपेक्षित. ॲड. साळवे हे मात्र याबाबत अपवाद आहेत.

बॉक्स

निळू फुलेंशी मैत्री

ॲड. साळवे यांचे वैचारिक मत प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांच्या परिवर्तनशील मताशी जुळले होते. म्हणूनच, काही वर्षांपूर्वी साळवे यांच्या नेतृत्वात बामणी येथे झालेल्या किसान जनजागृती शिबिरात निळू फुले यांनी हजेरी लावून कास्तकारांशी संवाद साधला. ते साळवे यांचे चांगले मित्र बनले.