शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

परिवर्तनशील विचारांचे साहित्यकार होते एकनाथ साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

वसंत खेडेकर बल्लारपूर : काही व्यक्तींमध्ये सदासर्वदा दांडगा उत्साह, कामात तरबेजपणा, उत्सवप्रियता वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम असते. चंद्रपूरचे माजी ...

वसंत खेडेकर

बल्लारपूर : काही व्यक्तींमध्ये सदासर्वदा दांडगा उत्साह, कामात तरबेजपणा, उत्सवप्रियता वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम असते. चंद्रपूरचे माजी आमदार, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी ॲड. एकनाथ साळवे हे त्यातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व!

एकनाथरावांचे जन्मगाव बल्लारपूरजवळील बामणी हे खेडे! कास्तकार कुटुंबात जन्मलेल्या एकनाथरावांना शिक्षणासोबतच वाचनाची व लिखाणाची आवड ! विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्याकडे, परिवर्तन चळवळीकडे वळले. विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एकनाथ साळवे यांनी पुरोगामी विचारांच्या चळवळी उभ्या केल्या. म. गांधीजी आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी ते जुळले. सेवादलाचे कार्यकर्ते झाले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे १९६७ व १९७२ असे ते दोनदा आमदार राहिले. काँग्रेस १९७८ ला दुभंगली. काँग्रेसचे इंडिकेट व सिंडिकेट असे दोन गट पडल्यानंतर ते सिंडिकेटकडून उभे राहिले; पण त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर राजकारणाला रामराम ठोकून त्यांनी सामाजिक परिवर्तन चळवळीकडे आपला मोर्चा वळविला. सोबतच त्यांनी लेखन केले. 'एन्काउंटर' ही आदिवासी जीवन संघर्षावर कादंबरी लिहिली. 'मी बुद्ध धम्म स्वीकारला' हे पुरोगामी विचारांचे पुस्तक लिहिले. इतरही काही पुरोगामी विचारांवर त्यांनी पुस्तके लिहिली. साहित्यासोबतच कलाक्षेत्रात उमदे रसिक म्हणून त्यांचा कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय वावर असायचा. हातात पेन, कागद ठेवून ते भाषणांचे रंग कलांचे मुद्दे टिपत! मग ते साहित्य संमेलन असू दे की, नृत्य वा गायन कार्यक्रम! त्यांची रसिकता वाखाणण्याजोगी होती. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले आहे. क्रांतिसूर्य ज्योतिबांच्या विचारांना ते अग्रभागी मानत, म्हणूनच त्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयांना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे दिलीत.

बॉक्स

एसटीनेच प्रवास

एकनाथ साळवे हे दोनदा आमदार झाले होते; पण ते नेहमीच एसटी बसनेच प्रवास करीत. दोनदा आमदार राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःची कार असणे अपेक्षित. ॲड. साळवे हे मात्र याबाबत अपवाद आहेत.

बॉक्स

निळू फुलेंशी मैत्री

ॲड. साळवे यांचे वैचारिक मत प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांच्या परिवर्तनशील मताशी जुळले होते. म्हणूनच, काही वर्षांपूर्वी साळवे यांच्या नेतृत्वात बामणी येथे झालेल्या किसान जनजागृती शिबिरात निळू फुले यांनी हजेरी लावून कास्तकारांशी संवाद साधला. ते साळवे यांचे चांगले मित्र बनले.