शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

ऐंशी टक्के पीक मातीत गेलं; कागदावर लिहिलं २९ टक्के

By साईनाथ कुचनकार | Updated: February 22, 2024 16:35 IST

अन्नदाता एकता मंच, पीक विम्याची रक्कम आता तरी द्या हो.

साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अशात ८० टक्के नुकसान झाले असतानाही कागदोपत्री केवळ २९.५६ टक्केच दाखविल्याचा आरोप करत अन्नदाता एकता मंचने पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात अन्नदाता एकता मंचने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ८० टक्के नुकसान झालेले असताना सुद्धा विमा कंपनीकडून २९.५६ टक्के दाखवण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन तथा उपोषण करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, विनोद ठोंबरे, सुनील मोरे, अमोल क्षीरसागर, सुनीता दर्वे, कविता कुटेमाटे, रत्नमाला आस्कर, वंदना आसुटकर, भास्कर कुटेमाटे, योगेश मत्ते, अक्षय कुटेमाटे, योगेश कुटेमाटे, भोजराज डाखरे, हेमंत बोबडे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

घेराव घातल्यानंतर मिळाली होती रक्कम :

सन २०२२ मध्ये विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ केली होती. नुकसानीचे प्रमाण अधिक असतानाही कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. यासंदर्भात पिपरी देशमुख येथील शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला होतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याची आठवणही शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना करून दिली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmerशेतकरी