शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

ऐंशी टक्के पीक मातीत गेलं; कागदावर लिहिलं २९ टक्के

By साईनाथ कुचनकार | Updated: February 22, 2024 16:35 IST

अन्नदाता एकता मंच, पीक विम्याची रक्कम आता तरी द्या हो.

साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अशात ८० टक्के नुकसान झाले असतानाही कागदोपत्री केवळ २९.५६ टक्केच दाखविल्याचा आरोप करत अन्नदाता एकता मंचने पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात अन्नदाता एकता मंचने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ८० टक्के नुकसान झालेले असताना सुद्धा विमा कंपनीकडून २९.५६ टक्के दाखवण्यात आले आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन तथा उपोषण करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, विनोद ठोंबरे, सुनील मोरे, अमोल क्षीरसागर, सुनीता दर्वे, कविता कुटेमाटे, रत्नमाला आस्कर, वंदना आसुटकर, भास्कर कुटेमाटे, योगेश मत्ते, अक्षय कुटेमाटे, योगेश कुटेमाटे, भोजराज डाखरे, हेमंत बोबडे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

घेराव घातल्यानंतर मिळाली होती रक्कम :

सन २०२२ मध्ये विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ केली होती. नुकसानीचे प्रमाण अधिक असतानाही कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. यासंदर्भात पिपरी देशमुख येथील शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला होतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याची आठवणही शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना करून दिली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmerशेतकरी