शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

सततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती

प्रवीण खिरटकर - वरोरासततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती करीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आणि त्यातून चांगला नफा मिळविला. रेशीम शेती आपल्या परिसरात घेऊन भरघोस उत्पादन घेण्याची किमया करीत या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. धानोली येथील राहुल विधाते व प्रसाद विधाते या दोघा भावंडांनी त्यांच्या शेतात अनेकविध प्रयोग केले आहेत. त्यात कुक्कुटपालन, फळबाग, प्रायोगिक तत्वावर मका उत्पादन, वन शेतीचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच त्यांनी एका एकरात रेशीमचे उत्पादन घेतले. त्यासाठी शेतात टिनाचे एक शेड उभारले. वर्धा जिल्ह्यातून तुतीच्या कलमा आणून एक एकरात त्या लावण्यात आल्या. ७५ ते ९० दिवसांत या कलमांचे आता झाडात रुपांतर होवून त्याला मोठ्या प्रमाणात पालव्या फुटल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातून रेशीम किड्यांची अंडी आणली. ती अंडी तुतीचे पाणे तोडून त्यात ठेवल्या जातात. त्यानंतर अंडीमधून अळ्या बाहेर येतात. त्या अळ्यांना तुतीची कोवळी पाने खाण्यासाठी देण्यात येतात. कोवळी पाने १४ दिवसांपर्यंत दिल्यानंतर या अळ्यांना एक दिवस उपाशी ठेवण्यात येते. त्या अळ्या २१ दिवसांत कोश तयार करतात. हा कोश दोन दिवसांत विक्रीसाठी घेवून जावे लागते. कोशामधून अंडी बाहेर गेल्यास कोशाचे वजन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. वर्षभरातून तीनवेळा उत्पादन मिळते. एका एकरात एक क्विंटल कोश तयार होतो. यामध्ये अंडी व तुतीच्या कलमांची किंमत अत्यल्प आहे. फक्त प्रक्रिया करण्यासाठी टिनाचे शेड एकदा उभारावे लागते. त्यासाठीच खर्च येतो. उत्पादन खर्च अत्यल्प असल्याने मोठ्या प्रमाणात रेशीमच्या उत्पादनातून नफा होत असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन राहिल्यास व्यापारी स्वत: शेतावर येवून खरेदी करीत असतात. महाराष्ट्रात १७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रेशीमला कमी भाव आहे. अशी खंत प्रसाद विधाते यांनी व्यक्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.