शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रेशीम उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

सततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती

प्रवीण खिरटकर - वरोरासततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती करीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आणि त्यातून चांगला नफा मिळविला. रेशीम शेती आपल्या परिसरात घेऊन भरघोस उत्पादन घेण्याची किमया करीत या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. धानोली येथील राहुल विधाते व प्रसाद विधाते या दोघा भावंडांनी त्यांच्या शेतात अनेकविध प्रयोग केले आहेत. त्यात कुक्कुटपालन, फळबाग, प्रायोगिक तत्वावर मका उत्पादन, वन शेतीचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच त्यांनी एका एकरात रेशीमचे उत्पादन घेतले. त्यासाठी शेतात टिनाचे एक शेड उभारले. वर्धा जिल्ह्यातून तुतीच्या कलमा आणून एक एकरात त्या लावण्यात आल्या. ७५ ते ९० दिवसांत या कलमांचे आता झाडात रुपांतर होवून त्याला मोठ्या प्रमाणात पालव्या फुटल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातून रेशीम किड्यांची अंडी आणली. ती अंडी तुतीचे पाणे तोडून त्यात ठेवल्या जातात. त्यानंतर अंडीमधून अळ्या बाहेर येतात. त्या अळ्यांना तुतीची कोवळी पाने खाण्यासाठी देण्यात येतात. कोवळी पाने १४ दिवसांपर्यंत दिल्यानंतर या अळ्यांना एक दिवस उपाशी ठेवण्यात येते. त्या अळ्या २१ दिवसांत कोश तयार करतात. हा कोश दोन दिवसांत विक्रीसाठी घेवून जावे लागते. कोशामधून अंडी बाहेर गेल्यास कोशाचे वजन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. वर्षभरातून तीनवेळा उत्पादन मिळते. एका एकरात एक क्विंटल कोश तयार होतो. यामध्ये अंडी व तुतीच्या कलमांची किंमत अत्यल्प आहे. फक्त प्रक्रिया करण्यासाठी टिनाचे शेड एकदा उभारावे लागते. त्यासाठीच खर्च येतो. उत्पादन खर्च अत्यल्प असल्याने मोठ्या प्रमाणात रेशीमच्या उत्पादनातून नफा होत असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन राहिल्यास व्यापारी स्वत: शेतावर येवून खरेदी करीत असतात. महाराष्ट्रात १७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रेशीमला कमी भाव आहे. अशी खंत प्रसाद विधाते यांनी व्यक्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.