शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

चंद्रपूर महानगराला वाहतूक कोंडीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:26 IST

शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना त्रास : मनपाकडे उपाययोजनेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच असल्याने हा मार्ग शहरातील मुख्य मार्ग समजला जातो. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना बराचवेळ ताटकळत राहावे लागते. सदर समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. मात्र पुरातत्व विभागाने याची दखल घेतली नाही. याचबरोबर शहरातील चोर खिडकी येथील मार्गसुद्धा अरुंद असल्याने मोठी प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. मात्र याठिकाणी वाहतूक विभागाने शिपायाची नेमणूक केली नाही. त्यामुळे याठिकाणी बºयाचदा वाहने काढताना वाहनचालकांचे वाद होतात. अनेकदा मारामारीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सपना टॉकीज चौक, गांधी चौक, अंचलेश्वर गेट, गिरणार चौक, छोटा बाजार चौक, बसस्थान चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.बाबूपेठ येथे उड्डाणपुलाची गरजबाबूपेठ येथून रेल्वे लाईन गेली असल्यामुळे रेल्वे जाताना बराच वेळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. त्याची दखल घेत संबंधित विभागाने याठिकाणी तीन ते चारदा उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन केले. मात्र अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी नागरिकांना बराच वेळ याठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे उड्डाणपूलाचे काम त्वरीत सुरु करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.वाढते अतिक्रमण हटवावेशहरातील म. गांधी चौक व कस्तुरबा मार्ग मुख्य मार्ग म्हणून ओळखले जातात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असते. हे मार्ग पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही दिवसेंदिवस अतिक्रमणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे मार्ग पुन्हा अरुंद झाल्याने या मार्गावरुन वाहन काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तरीसुद्धा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीमेचा विसर पडला आहे.बेलगाम पार्किंगच कारणीभूतशहरामध्ये अनेक चौकात पार्किंगचे स्पॉट निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरच वाहने ठेवत असतात. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने चौका-चौकात पार्किंग स्पाट तयार करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.वाहतूक शिपायाची नियुक्ती करावीशहरातील चोर खिडकी, गंजवॉर्ड, गोल बाजार, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे अनेकदा वाहन काढताना वाहनचालकांचे आपसात वाद झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करावी, तसेच लोकमान्य टिळक विद्यालय व हिंदी सिटी हायस्कूल येथे शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत असते. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून जटपूरा गेट येथे दोन वाहतूक शिपायांची तसेच प्रियदर्शिनी चौकानजीक पाण्याच्या टाकीजवळ एका पोलीस शिपायाची नेमणूक केली आहे. तसेच दवाबाजार शेजारील वनवे सुरु करण्यात आला आहे.- विलास चव्हाण, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर