शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महानगराला वाहतूक कोंडीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:26 IST

शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना त्रास : मनपाकडे उपाययोजनेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच असल्याने हा मार्ग शहरातील मुख्य मार्ग समजला जातो. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना बराचवेळ ताटकळत राहावे लागते. सदर समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. मात्र पुरातत्व विभागाने याची दखल घेतली नाही. याचबरोबर शहरातील चोर खिडकी येथील मार्गसुद्धा अरुंद असल्याने मोठी प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. मात्र याठिकाणी वाहतूक विभागाने शिपायाची नेमणूक केली नाही. त्यामुळे याठिकाणी बºयाचदा वाहने काढताना वाहनचालकांचे वाद होतात. अनेकदा मारामारीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सपना टॉकीज चौक, गांधी चौक, अंचलेश्वर गेट, गिरणार चौक, छोटा बाजार चौक, बसस्थान चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.बाबूपेठ येथे उड्डाणपुलाची गरजबाबूपेठ येथून रेल्वे लाईन गेली असल्यामुळे रेल्वे जाताना बराच वेळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. त्याची दखल घेत संबंधित विभागाने याठिकाणी तीन ते चारदा उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन केले. मात्र अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी नागरिकांना बराच वेळ याठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे उड्डाणपूलाचे काम त्वरीत सुरु करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.वाढते अतिक्रमण हटवावेशहरातील म. गांधी चौक व कस्तुरबा मार्ग मुख्य मार्ग म्हणून ओळखले जातात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असते. हे मार्ग पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही दिवसेंदिवस अतिक्रमणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे मार्ग पुन्हा अरुंद झाल्याने या मार्गावरुन वाहन काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तरीसुद्धा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीमेचा विसर पडला आहे.बेलगाम पार्किंगच कारणीभूतशहरामध्ये अनेक चौकात पार्किंगचे स्पॉट निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरच वाहने ठेवत असतात. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने चौका-चौकात पार्किंग स्पाट तयार करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.वाहतूक शिपायाची नियुक्ती करावीशहरातील चोर खिडकी, गंजवॉर्ड, गोल बाजार, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे अनेकदा वाहन काढताना वाहनचालकांचे आपसात वाद झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करावी, तसेच लोकमान्य टिळक विद्यालय व हिंदी सिटी हायस्कूल येथे शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत असते. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून जटपूरा गेट येथे दोन वाहतूक शिपायांची तसेच प्रियदर्शिनी चौकानजीक पाण्याच्या टाकीजवळ एका पोलीस शिपायाची नेमणूक केली आहे. तसेच दवाबाजार शेजारील वनवे सुरु करण्यात आला आहे.- विलास चव्हाण, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर