शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

प्रत्येक विद्यार्थ्याला देणार रूबेला इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:46 PM

आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देमनपा : आढावा बैठकीत संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.या समितीमध्ये वैद्यकीय व्यावसायिक, शाळा प्रशासन, जागतिक आरोग्य संघटना, शिक्षण संस्था, समाज कल्याण विभाग, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, इनरव्हिल क्लब, जेसीआय, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आॅफ पेडियाट्रीक, नर्सिंग स्कूल, लेखा व्यवस्थापक, मदरशाचे प्राचार्य, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांमार्फत पालकांना लसिकरण मोहिमेची माहिती देणे आणि परवानगी घेण्याबाबत चर्चा झाली. शहरात १४ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ० ते १५ वयोगटातील कोणताही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प समिती यावेळी जाहीर केला. निरोगी आयुष्यासाठी पालकांनीआपल्या पाल्याला इंजेक्शन दिलेच पाहिजे. यासाठी सर्व उपलब्ध साधनसामुग्रीचा मनपाकडून वापर केला जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या वापरातून लसीकरण करण्यासाठी विविध टप्पे तयार करण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागाचे नियोजन कसे असावे, यावरही सदस्यांनी सूचना केल्या.मिजल्स-रुबेला काय आहे ?मिजल्स म्हणजे गोवर होय. रुबेला हा गोवरसारखाच सौम्य आजार आहे. परंतु, हा आजार गरोदर मातेला झाला तर बाळाला जन्मजात आजार होऊ शकतो. शरिरामध्ये जन्मजात विकार निर्माण होतात. मतिमंदता, आंधळेपणा, बहिरेपणा, हृदयाचे विकार तसेच गरोदर मातेचा गर्भपातही होऊ शकतो. जगभरात हा आजार वाढत असून त्यामध्ये भारताची टक्केवारी ३६ टक्के आहे. विकसीत देशांमधून हा आजार हद्दपार झाला आहे.