शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

खेड्यापाड्यातील घाणमाकड झाल्या लुप्त !

By admin | Updated: March 13, 2016 01:06 IST

होळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घानमाकडीचे दर्शन घडत आहे.

परंपरा जोपसण्याची गरज : नव्या पिढीला घाणमाकडच ठाऊक नाहीघनश्याम नवघडे नागभीडहोळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घानमाकडीचे दर्शन घडत आहे.साधारणत: ३० ते ३५ वर्षा अगोदर घाणमाकडही खेड्यातील मुलांचे मनोरंजनाचे प्रमुख साधने होती. उन्ह्याळ्यात मुलांना अभ्यासाचे टेंशन नसते, बहुतेक वेळ फावला असतो. त्याकाळी टी.व्ही. मोबाईल आजच्यासारखे नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परंपरागत खेळांमधूनच मनोरंजन करावा लागत असे.पण आता काळ बदलला आणि काळाबरोबर मनोरंजनाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या. परंपरागत खेळणी तसेच मनोरंजनाची साधने कालबाह्य झाली. त्यांची जागा आता टीव्ही, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून होळीनंतर प्रत्येक खेड्यात दिसणारी घानमाकड आता कालबाह्य नाही तर दिसेनाशी झाली आहे.उन्ह्याळ्याची चाहूल लागताच गावातील काही प्रमुख ‘पोरं’ एकत्र यायची. जंगलात किंवा शेतात जावून धनुष्य बाणाच्या आकाराचा लाकुड आणायचे. मधोमध त्याला एक छिद्र पाडायचे आणि गाातील चौकात एक खांब गाडून त्यावर ही घानमाकड लावायची. दिवसा एखाद्या झाडाखाली तर रात्री एखाद्या चौकात या घानमाकडींचा आवाज सुरूच असायचा. दोन बाजुला दोघे बसले की, आळीपाळीने दोघे झोके द्यायचे आणि त्यांना दम भरेपर्यंत हे झोके सुरूच राहचे. दम भरल्यानंतर ते उतरायचे आणि नंतर दुसरे चढायचे. काही टारगट मुले आजुबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश आवाज करण्यासाठी घानमाकडीच्या छिद्रामध्ये मुद्दाम सागरगोट्या किंवा वाघनख टाकायचे.पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये गुरांची बैठक शेतातील एखाद्या आंबराईत किंवा एखाद्या मोठ्या झाडात असायची. गुरांनी बैठक घेतली की गुराखी हटकून घानमाकडीचा खेळ खेळायचे. पण आता तेव्हढी गुरेही राहिली नाहीत आणि घानमाकडीचा खेळही उरला नाही.आजच्या पिढीला घानमाकड हा शब्द विचित्र वाटेल. पण घानमाकडीवर झोके घेण्यात जो आनंद व्हायचा, तो अवर्णनीय होता. मी हा अनुभव घेतला आहे. पण आज घानमाकड कुठेच दिसत नाही.- प्रा. डॉ. अनिल कोरपेनवार